शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला; ११६ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST

मागच्या एक-दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले असले तरी रुग्णांच्या वाढत्या संख्येला ...

मागच्या एक-दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले असले तरी रुग्णांच्या वाढत्या संख्येला अजूनही अटकाव बसलेला नाही. १६ मार्च रोजी आरोग्य विभागाला आरटीपीसीआरच्या ६२७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ११६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ९ हजार ५३६ रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी ८ हजार ६४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३४६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ५४१ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९५ झाली आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात १३५ रुग्ण उपचार घेत असून, ३११ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत.

या भागात आढळले रुग्ण

परभणी शहरातील शिवाजीनगर, अमिन कॉलनी, त्रिमूर्तीनगर, वैभवनगर, शिवाजी चौक, खासगी रुग्णालय, विष्णुनगर, शिवरामनगर, नाथनगर, खंडोबा बाजार, कोमटी गल्ली, लक्ष्मीनगर, गांधी पार्क, कृषी सारथी कॉलनी, लोकमान्यनगर, स्टेशन रोड, गुजरी बाजार, सुयोग कॉलनी, भाग्यलक्ष्मीनगर, गजानननगर, गणेशनगर, आझम चौक, नवा मोंढा, रामकृष्णनगर, वकील कॉलनी, राणी लक्ष्मीबाईनगर, इंदिरानगर, अपना कॉर्नर, भाजी मंडई, नानलपेठ, विसावा कॉर्नर, पार्वतीनगर, दत्तनगर जिंतूर रोड, संत तुकारामनगर, कल्याणनगर, यशोदानगरी, रंगनाथनगर, मथुरानगर, साखला प्‍लॉट, काद्राबाद प्लॉट, गव्हाणे रोड, धनलक्ष्मीनगर आदी भागांमध्ये रुग्णांची नोंद झाली आहे.