शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला ३ हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. ...

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले. अनलॉक प्रक्रियेनंतर काही अटींच्या अधिन राहून लग्न सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली असली तरी कोरोनाची नागरिकांच्या मनात धास्ती कायम होती. त्यामुळे नियोजित विवाह सोहळ्यांवर परिणाम झाला असेल, असे सर्वसामान्यांना वाटत होते; परंतु प्रत्यक्षात हा समज खोटा ठरला आहे. जिल्ह्यात कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या वर्षभरात जवळपास ३ हजार लग्न विवाह सोहळे पार पडले आहे. लग्न केल्यानंतर शासन नियमानुसार त्याची संबंधित शासकीय कार्यालयात नोंद करणे आवश्यक आहे. त्यानुसार परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करण्यात आलेल्या नोंदणीनुसार २०२० या वर्षी परभणी तालुक्यात ५२ दाम्पत्यांनी विवाहाची नोंदणी केली. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनाचे संकट अधिक गडद असतानाही गेल्या दोन महिन्यात ११ दाम्पत्यांनी परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे विवाहाची नोंद केली आहे. अनेकांनी मात्र नोंदणी केलेली नाही.

वर्षभरात २७ लग्नतिथी

गत वर्षी १० मार्चपासून विवाह मुहूर्त सुरू झाले होते; परंतु कोरोनामुळे राज्यात १८ मार्चपासून प्रतिबंध लागू करण्यात आले. २२ मार्चपासून तर देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. या वर्षात मार्चनंतर अनेक विवाह मुहूर्त होते. त्यात १६, १७, २५, २६ एप्रिल, १, २, ४, ५, ६, १५, १७, १८, २३ मे, ११, १५, १७, २७, २९, ३० जून, २७, २९, ३० नोव्हेंबर, १,७,९, १०, ११ डिसेंबर या कालावधीत विवाह मुहूर्त होते; परंतु कोरोनामुळे या विवाह सोहळ्यावर परिणाम झाला.

६३ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल

परभणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे तालुक्यातील ५२ विवाह सोहळ्याची २०२० या वर्षात नोंद झाली आहे. ही आकडेवारी परभणीपुरतीच मर्यादित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात गेल्या वर्षभरात जवळपास ३ हजार विवाह सोहळे झाले आहेत. त्याच्या नोंदी मात्र स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगर पालिका कार्यालयात नाहीत.

एप्रिल कठीण

चालू वर्षात आतापर्यंत ११ विवाह सोहळ्याची परभणीतील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंद झाली आहे. चालू एप्रिल महिन्यात २२, २४, २६, २७, २८, २९, ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत; परंतु ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने प्रशासनाच्या नियमामुळे विवाह होणे कठीण आहे.

दोन वर्षात सर्व लग्न रद्द झाल्याने नुकसान झाले आहे. मंगल कार्यालयात दुरुस्ती, नवीन कामे मागील वर्षी केली, त्याचा खर्च अद्याप निघाला नाही. वरून विजेचे बिल घरातून भरण्याची वेळ आली आहे.

- प्रमोद वाकोडकर, अध्यक्ष, जिल्हा मंगल कार्यालय संघटना.