शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST

परभणी शहरात उच्चशिक्षित नियोजित वधू-वरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या वधू-वरांचे विवाह जुळविण्यासाठी त्यांचे पालक अनेक ठिकाणी संपर्क साधून ...

परभणी शहरात उच्चशिक्षित नियोजित वधू-वरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या वधू-वरांचे विवाह जुळविण्यासाठी त्यांचे पालक अनेक ठिकाणी संपर्क साधून चांगले स्थळ कसे मिळेल, याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाला हुशार जावई तसेच घरी जुळवून घेणारी सून मिळावी, याची अपेक्षा असते. पालकांसोबत वधू-वरांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी स्थळाची बोलणी, मग प्रत्यक्ष पाहणी या प्रक्रिया पार पाडल्या जातात. कोरोनानंतर अनेकांच्या शिक्षण, नोकरी, पैसा या अपेक्षा कमी झाल्या आहेत तसेच मेट्रो सिटीतील जावयाच्या थाटापेक्षा एकत्रित कुटूंब पध्दतीतील वधू-वर मिळावेत, यासाठी तडजोड केली जात आहे.

या अपेक्षांची पडली भर

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अशा स्थितीत पालक नोकरीपेक्षा मुला-मुलीच्या कुटुंबातील आर्थिक तसेच सामाजिक स्थिती पाहून लग्न जुळवित आहेत. शेती तसेच राहते घर व अन्य स्थावर-जंगम मालमत्ता पाहून लग्न जुळविले जात आहेत. यात वराची निवड करताना त्याचे शिक्षण तपासले जात आहे.

या अपेक्षा झाल्या कमी

वधूच्या बाबतीमध्ये शिक्षणाची अट न घालता आपल्या घरात सून म्हणून ती कशी घराला जुळवून घेऊ शकेल याचा विचार अनेक पालक व इच्छुक वर करीत आहेत. नोकरीपेक्षा घरातील स्थिती, एखादा व्यवसाय असला तरी त्यास पसंती दिली जात आहे. मेट्रो सिटीतील थाटबाट आता पाहिला जात नाही. जेथे घर आणि जी नोकरी असेल त्यात समाधानी राहून संसार करण्याचा विचार नियोजित वधू-वर आणि त्यांचे पालक करीत आहेत.

सोशल मिडीयावर नोंदणी वाढली

आता पूर्वीसारखे विवाह जुळविण्यासाठी मेळावे घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यात कोरोनाने तर हे मेळावे बंदच झाले आहेत. यामुळे पालक व नियोजित वधू-वर सोशल मिडीयावर विवाहासाठी नोंदणी करीत आहेत. यावर सर्व अपेक्षा जुळल्यानंतर एकदा पाहणी केली जात आहे. यामुळे विवाह सूचक मंडळ तसेच मध्यस्थी यांचे प्रमाण कमी झाले आहे.

वधू-वर सूचक मंडळ चालक म्हणतात...

मागील ११ वर्षापासून शहरात वधू-वर सूचक मंडळ चालवितो. यात ४० हजार जणांची नाव नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील दीड वर्षात झटपट विवाह जुळविणे आणि लग्न पार पाडणे याची घाई पालकांसह वधू-वरांना झाली आहे. सध्या अनेकांच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत. यामुळे लग्न जुळण्याचे प्रमाण वाढले आहे. - सचिद्दानंद कुलकर्णी.