शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST

परभणी शहरात उच्चशिक्षित नियोजित वधू-वरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या वधू-वरांचे विवाह जुळविण्यासाठी त्यांचे पालक अनेक ठिकाणी संपर्क साधून ...

परभणी शहरात उच्चशिक्षित नियोजित वधू-वरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या वधू-वरांचे विवाह जुळविण्यासाठी त्यांचे पालक अनेक ठिकाणी संपर्क साधून चांगले स्थळ कसे मिळेल, याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाला हुशार जावई तसेच घरी जुळवून घेणारी सून मिळावी, याची अपेक्षा असते. पालकांसोबत वधू-वरांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी स्थळाची बोलणी, मग प्रत्यक्ष पाहणी या प्रक्रिया पार पाडल्या जातात. कोरोनानंतर अनेकांच्या शिक्षण, नोकरी, पैसा या अपेक्षा कमी झाल्या आहेत तसेच मेट्रो सिटीतील जावयाच्या थाटापेक्षा एकत्रित कुटूंब पध्दतीतील वधू-वर मिळावेत, यासाठी तडजोड केली जात आहे.

या अपेक्षांची पडली भर

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अशा स्थितीत पालक नोकरीपेक्षा मुला-मुलीच्या कुटुंबातील आर्थिक तसेच सामाजिक स्थिती पाहून लग्न जुळवित आहेत. शेती तसेच राहते घर व अन्य स्थावर-जंगम मालमत्ता पाहून लग्न जुळविले जात आहेत. यात वराची निवड करताना त्याचे शिक्षण तपासले जात आहे.

या अपेक्षा झाल्या कमी

वधूच्या बाबतीमध्ये शिक्षणाची अट न घालता आपल्या घरात सून म्हणून ती कशी घराला जुळवून घेऊ शकेल याचा विचार अनेक पालक व इच्छुक वर करीत आहेत. नोकरीपेक्षा घरातील स्थिती, एखादा व्यवसाय असला तरी त्यास पसंती दिली जात आहे. मेट्रो सिटीतील थाटबाट आता पाहिला जात नाही. जेथे घर आणि जी नोकरी असेल त्यात समाधानी राहून संसार करण्याचा विचार नियोजित वधू-वर आणि त्यांचे पालक करीत आहेत.

सोशल मिडीयावर नोंदणी वाढली

आता पूर्वीसारखे विवाह जुळविण्यासाठी मेळावे घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यात कोरोनाने तर हे मेळावे बंदच झाले आहेत. यामुळे पालक व नियोजित वधू-वर सोशल मिडीयावर विवाहासाठी नोंदणी करीत आहेत. यावर सर्व अपेक्षा जुळल्यानंतर एकदा पाहणी केली जात आहे. यामुळे विवाह सूचक मंडळ तसेच मध्यस्थी यांचे प्रमाण कमी झाले आहे.

वधू-वर सूचक मंडळ चालक म्हणतात...

मागील ११ वर्षापासून शहरात वधू-वर सूचक मंडळ चालवितो. यात ४० हजार जणांची नाव नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील दीड वर्षात झटपट विवाह जुळविणे आणि लग्न पार पाडणे याची घाई पालकांसह वधू-वरांना झाली आहे. सध्या अनेकांच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत. यामुळे लग्न जुळण्याचे प्रमाण वाढले आहे. - सचिद्दानंद कुलकर्णी.