शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

पाणी उपसा करणाऱ्या ठेकेदारास अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:43 IST

तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामासाठी पाणी नेत असलेल्या ठेकेदाराला ११ जानेवारी रोजी येथील ग्रामस्थांनी अडविले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे पाणी गावासाठी आरक्षित करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामासाठी पाणी नेत असलेल्या ठेकेदाराला ११ जानेवारी रोजी येथील ग्रामस्थांनी अडविले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे पाणी गावासाठी आरक्षित करण्याची मागणी केली.मानवत तालुक्यातील सोमठाणा गावाजवळ लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना ठेकेदार कंपनीने कामासाठी मुरूमाचे उत्खनन केले होेते. उत्खनन झालेल्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे जनावरांना पिण्यासाठी हे पाणी आरक्षित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तहसीलदार डी.डी. फुफाटे यांच्याकडे नुकतीच केली होती.ग्रामस्थांनी पाणी आरक्षित करण्याची मागणी केलेली असताना ११ जानेवारी रोजी कालव्याचे काम करणाºया ठेकेदार कंपनीचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी आले होते. ही बाब ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी पाणी असलेल्या ठिकाणी आंदोलन करीत ठेकेदार कंपनीस पाणी नेऊ दिले नाही. यावेळी सरपंच राजाराम कुकडे, ग्रामपंचायत सदस्य रविकांत निर्वळ, माधव निर्वळ, परमेश्वर निर्वळ, बाबासाहेब भदर्गे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे तहसील प्रशासनाने पाणी उपसा न करण्याच्या सूचना दिल्या असून पाणी उपसा थांबविण्यात आला आहे.ग्रामस्थांच्या मागणीकडे तहसीलचे दुर्लक्ष४मानवत तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने पहिल्याच यादीमध्ये मानवत तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश केला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मानवत तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने डिसेंबर महिन्यातच तालुक्याची पाणीपातळी खालावली. परिणामी नदी, नाले, ओढे कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच तालुक्यातील मानवत येथील सोमठाणा येथील मुरूमाने उत्खनन केलेल्या ठिकाणी साचलेले पावसाचे पाणी जनावरांना पिण्यासाठी आरक्षित ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ३ जानेवारी रोजी केली होती.४मागणी करूनही तहसील प्रशासनाने सोमठाणा ग्रा.पं.च्या ठरावाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम करणाºया ठेकेदाराने पाणी उपसण्यास सुरु केली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाणी न उपसण्याच्या तोंडी सूचना संंबंधित ठेकेदाराला तहसीलदारांना द्याव्या लागल्या.पुढील आदेश येईपर्यंत पाणी उपसा न करण्याच्या तोंडी सूचना संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.-डी.डी. फुफाटे,तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीwater transportजलवाहतूक