शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महाविकास आघाडीतील घटक पक्षच एकमेकांविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST

जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत मानवत तालुक्यातील सावरगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत होत असून ...

जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत मानवत तालुक्यातील सावरगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत होत असून ताडबोरगाव येथे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस-शिवसेना अशी लढत होत आहे. उक्कलगाव येथे शिवसेना, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत असून, भोसा, पिंपळा, कोथाळा येथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस तर पाळोदीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. हत्तलवाडीत राष्ट्रवादीच्या दोन पॅनलमध्ये लढत होत असून, रूढी येथे तिरंगी लढत होत आहे. खरबा येथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी तर रामपुरी येथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना लढत होत आहे. पालममधील बहुतांश गावांमध्ये पक्षविरहित लढती होत आहेत. पाथरी तालुक्यात उमरा येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. हादगाव बु. येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवेसना व इतर अशी लढत होत आहे. याशिवाय डोंगरगाव, कानसूर, विटा बु. बाबूलतार येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, देवनांद्रा येथे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, वाघाळा येथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर बाभळगाव येथे राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध गबाळ गट अशी लढत होत आहे. लिंबा येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. गंगाखेड तालुक्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-भाजप-रासपविरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. राणीसावरगाव येथे पक्षविरहित पॅनल आहेत. इतर ठिकाणीही दोन ते तीन पॅनलमध्ये लढती होत आहेत.

भांबळे विरुद्ध बोर्डीकर लढती

जिंतूर विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी भांबळे विरुद्ध बोर्डीकर असाच ग्रा.पं. निवडणुकीत सामना होत आहे. तालुक्यातील बोरी येथे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. येथे राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचे पॅनल आहे, तर भाजपचे स्वतंत्र पॅनल आहे. याशिवाय चारठाणा, सावंगी म्हाळसा, अंबरवाडी आदी ठिकाणीही महाविकास आघाडी दुभंगली आहे. सेलू तालुक्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. झोडगावात मात्र राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप अशी लढत होत आहे.

जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र येणे कठिणच

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्ह्यात फक्त जिल्हा परिषदेत यशस्वी ठरला आहे. इतरत्र कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या एका गटामध्ये कमालीचे मतभेद आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या एका गटात वितुष्ट आले आहे, त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र येणे कठिण आहे.