शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

महाविकास आघाडीतील घटक पक्षच एकमेकांविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST

जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत मानवत तालुक्यातील सावरगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत होत असून ...

जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत मानवत तालुक्यातील सावरगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत होत असून ताडबोरगाव येथे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस-शिवसेना अशी लढत होत आहे. उक्कलगाव येथे शिवसेना, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत असून, भोसा, पिंपळा, कोथाळा येथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस तर पाळोदीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. हत्तलवाडीत राष्ट्रवादीच्या दोन पॅनलमध्ये लढत होत असून, रूढी येथे तिरंगी लढत होत आहे. खरबा येथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी तर रामपुरी येथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना लढत होत आहे. पालममधील बहुतांश गावांमध्ये पक्षविरहित लढती होत आहेत. पाथरी तालुक्यात उमरा येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. हादगाव बु. येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवेसना व इतर अशी लढत होत आहे. याशिवाय डोंगरगाव, कानसूर, विटा बु. बाबूलतार येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, देवनांद्रा येथे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, वाघाळा येथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर बाभळगाव येथे राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध गबाळ गट अशी लढत होत आहे. लिंबा येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. गंगाखेड तालुक्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-भाजप-रासपविरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. राणीसावरगाव येथे पक्षविरहित पॅनल आहेत. इतर ठिकाणीही दोन ते तीन पॅनलमध्ये लढती होत आहेत.

भांबळे विरुद्ध बोर्डीकर लढती

जिंतूर विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी भांबळे विरुद्ध बोर्डीकर असाच ग्रा.पं. निवडणुकीत सामना होत आहे. तालुक्यातील बोरी येथे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. येथे राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचे पॅनल आहे, तर भाजपचे स्वतंत्र पॅनल आहे. याशिवाय चारठाणा, सावंगी म्हाळसा, अंबरवाडी आदी ठिकाणीही महाविकास आघाडी दुभंगली आहे. सेलू तालुक्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. झोडगावात मात्र राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप अशी लढत होत आहे.

जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र येणे कठिणच

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्ह्यात फक्त जिल्हा परिषदेत यशस्वी ठरला आहे. इतरत्र कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या एका गटामध्ये कमालीचे मतभेद आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या एका गटात वितुष्ट आले आहे, त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र येणे कठिण आहे.