शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

महाविकास आघाडीतील घटक पक्षच एकमेकांविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST

जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत मानवत तालुक्यातील सावरगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत होत असून ...

जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत मानवत तालुक्यातील सावरगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत होत असून ताडबोरगाव येथे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस-शिवसेना अशी लढत होत आहे. उक्कलगाव येथे शिवसेना, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत असून, भोसा, पिंपळा, कोथाळा येथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस तर पाळोदीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. हत्तलवाडीत राष्ट्रवादीच्या दोन पॅनलमध्ये लढत होत असून, रूढी येथे तिरंगी लढत होत आहे. खरबा येथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी तर रामपुरी येथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना लढत होत आहे. पालममधील बहुतांश गावांमध्ये पक्षविरहित लढती होत आहेत. पाथरी तालुक्यात उमरा येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. हादगाव बु. येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवेसना व इतर अशी लढत होत आहे. याशिवाय डोंगरगाव, कानसूर, विटा बु. बाबूलतार येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, देवनांद्रा येथे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, वाघाळा येथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर बाभळगाव येथे राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध गबाळ गट अशी लढत होत आहे. लिंबा येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. गंगाखेड तालुक्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-भाजप-रासपविरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. राणीसावरगाव येथे पक्षविरहित पॅनल आहेत. इतर ठिकाणीही दोन ते तीन पॅनलमध्ये लढती होत आहेत.

भांबळे विरुद्ध बोर्डीकर लढती

जिंतूर विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी भांबळे विरुद्ध बोर्डीकर असाच ग्रा.पं. निवडणुकीत सामना होत आहे. तालुक्यातील बोरी येथे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. येथे राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचे पॅनल आहे, तर भाजपचे स्वतंत्र पॅनल आहे. याशिवाय चारठाणा, सावंगी म्हाळसा, अंबरवाडी आदी ठिकाणीही महाविकास आघाडी दुभंगली आहे. सेलू तालुक्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. झोडगावात मात्र राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप अशी लढत होत आहे.

जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र येणे कठिणच

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्ह्यात फक्त जिल्हा परिषदेत यशस्वी ठरला आहे. इतरत्र कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या एका गटामध्ये कमालीचे मतभेद आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या एका गटात वितुष्ट आले आहे, त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र येणे कठिण आहे.