शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा; ८९ वृद्धांची कोरोनावर मात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST

कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक जण घाबरून जातात. त्याचा त्यांच्या उपचार पद्धतीवर परिणाम होतो. त्यातून येणारे नैराश्य कधी कधी जीवघेणे ...

कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक जण घाबरून जातात. त्याचा त्यांच्या उपचार पद्धतीवर परिणाम होतो. त्यातून येणारे नैराश्य कधी कधी जीवघेणे ठरते. यासाठी योग्य वेळी आजाराचे निदान, योग्य उपचार, डॉक्टरांच्या सूचनांचे तंतोतंत पालन आणि मनाची खंबीरता असेल तर कोरोनावर मात करता येते, हे अनेक वयोवृद्धांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ८९ वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात ९१ ते १०० वर्ष वयोगटातील ४४ तर १०१ ते १३० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील ५२ वृद्धांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या फक्त ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे कोरोनावर इच्छाशक्तीच्या बळावर मात करता येते, हे या वृद्धांनी दाखवून दिले आहे.

६० ते ७० वयोगटात सर्वाधिक मृत्यू

जिल्ह्यात ६० ते ७० वर्ष वयोगटातील सर्वाधिक व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात या वयोगटातील ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय ५० ते ६० वर्ष वयोगटातील ३०७ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

७० ते ८० वर्ष वयोगटातील १८२ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.