शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा; ८९ वृद्धांची कोरोनावर मात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST

कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक जण घाबरून जातात. त्याचा त्यांच्या उपचार पद्धतीवर परिणाम होतो. त्यातून येणारे नैराश्य कधी कधी जीवघेणे ...

कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक जण घाबरून जातात. त्याचा त्यांच्या उपचार पद्धतीवर परिणाम होतो. त्यातून येणारे नैराश्य कधी कधी जीवघेणे ठरते. यासाठी योग्य वेळी आजाराचे निदान, योग्य उपचार, डॉक्टरांच्या सूचनांचे तंतोतंत पालन आणि मनाची खंबीरता असेल तर कोरोनावर मात करता येते, हे अनेक वयोवृद्धांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ८९ वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात ९१ ते १०० वर्ष वयोगटातील ४४ तर १०१ ते १३० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील ५२ वृद्धांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या फक्त ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे कोरोनावर इच्छाशक्तीच्या बळावर मात करता येते, हे या वृद्धांनी दाखवून दिले आहे.

६० ते ७० वयोगटात सर्वाधिक मृत्यू

जिल्ह्यात ६० ते ७० वर्ष वयोगटातील सर्वाधिक व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात या वयोगटातील ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय ५० ते ६० वर्ष वयोगटातील ३०७ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

७० ते ८० वर्ष वयोगटातील १८२ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.