शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कृषीधोरण अभियानातून शेतकऱ्यांना बिलात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:48 IST

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून कृषिपंपाचे थकीत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी सवलत दिली जाणार आहे. यासाठी ...

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून कृषिपंपाचे थकीत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी सवलत दिली जाणार आहे. यासाठी तालुक्यात कृषी धोरण अभियान राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना बिल भरणा केल्यानंतर सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॅाईंटही तयार करण्यात आला आहे.

पालम तालुक्यातील ग्रामीण भागात ६ हजार शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे वीजबिल थकीत आहेत. त्यामुळे अनेकदा रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करावा लागतो. शासनाने वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘कृषी धोरण - २०२१’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानातून थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून चालू खातेदार होता येणार आहे. यातही बिल भरण्यासाठी टप्पे पाडून दिले जात आहेत. थकीत रक्कम भरल्यानंतर प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामविकास कामे, ३३ टक्के रक्कम त्या गावातील विद्युत अद्ययावतीकरण व ३४ टक्के रक्कम तालुका महावितरण कार्यालयात खर्चासाठी वापरली जाणार आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपअभियंता व्ही. डी. स्वामी यांनी केले आहे.

पालममध्ये बनवला सेल्फी पाईंट

पालमच्या महावितरण कार्यालयात कृषिपंपाच्या वीजबिलाची थकीत रक्कम भरल्यानंतर अन्य शेतकऱ्यांनी या अभियानाकडे वळावे, यासाठी बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पाईंट बनवला आहे. याठिकाणी सेल्फी काढून तो समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात येणार आहे.