शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार!, पावसाचा अंदाज खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 05:28 IST

या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरला.

परभणी : या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरला. त्यामुळे आपली व राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून हवामान खात्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर कदम यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मे महिन्यामध्ये विविध प्रसारमाध्यमांमध्ये हवामान खात्याच्या वतीने मराठवाडा व राज्यातील इतर ठिकाणी २०१८मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु, तो सपशेल खोटा ठरला आहे. मराठवाड्यात आजही १४० महसूल मंडळामध्ये गंभीर पाणीटंचाई व दुष्काळ आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५पैकी ५६ मंडळे कोरडीठाक आहेत. परभणी जिल्ह्यातील ३८पैकी ८ ते १० मंडळांमध्ये जेमतेम पाऊस आहे. जालना जिल्ह्यामध्येसुद्धा ५५पैकी ७ मंडळांमध्ये मध्यम पाऊस आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात १६ दिवस, जुलै महिन्यामध्ये १३ दिवस व आॅगस्ट महिन्यात एकही दिवस पाऊस झालेला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने खत, बियाणे, औषधी उत्पादक कंपन्यांकडून विविध प्रकारचे पॅकेज घेऊन व शेअर बाजरातून उलाढाल वाढविण्यासाठी चुकीची माहिती महाराष्ट्र शासन व शेतकºयांना दिली आहे. आशिया खंडातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. अशा चुकीच्या माहितीमुळे हा आकडा रोज वाढत आहे. त्यामुळे या बाबींची चौकशी करून हवामान खात्याच्या संचालकांवर भादंवि ४२०नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे.