शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हवामान खात्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार!, पावसाचा अंदाज खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 05:28 IST

या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरला.

परभणी : या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरला. त्यामुळे आपली व राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून हवामान खात्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर कदम यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मे महिन्यामध्ये विविध प्रसारमाध्यमांमध्ये हवामान खात्याच्या वतीने मराठवाडा व राज्यातील इतर ठिकाणी २०१८मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु, तो सपशेल खोटा ठरला आहे. मराठवाड्यात आजही १४० महसूल मंडळामध्ये गंभीर पाणीटंचाई व दुष्काळ आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५पैकी ५६ मंडळे कोरडीठाक आहेत. परभणी जिल्ह्यातील ३८पैकी ८ ते १० मंडळांमध्ये जेमतेम पाऊस आहे. जालना जिल्ह्यामध्येसुद्धा ५५पैकी ७ मंडळांमध्ये मध्यम पाऊस आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात १६ दिवस, जुलै महिन्यामध्ये १३ दिवस व आॅगस्ट महिन्यात एकही दिवस पाऊस झालेला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने खत, बियाणे, औषधी उत्पादक कंपन्यांकडून विविध प्रकारचे पॅकेज घेऊन व शेअर बाजरातून उलाढाल वाढविण्यासाठी चुकीची माहिती महाराष्ट्र शासन व शेतकºयांना दिली आहे. आशिया खंडातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. अशा चुकीच्या माहितीमुळे हा आकडा रोज वाढत आहे. त्यामुळे या बाबींची चौकशी करून हवामान खात्याच्या संचालकांवर भादंवि ४२०नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे.