शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

हवामान खात्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार!, पावसाचा अंदाज खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 05:28 IST

या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरला.

परभणी : या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खोटा ठरला. त्यामुळे आपली व राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून हवामान खात्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर कदम यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मे महिन्यामध्ये विविध प्रसारमाध्यमांमध्ये हवामान खात्याच्या वतीने मराठवाडा व राज्यातील इतर ठिकाणी २०१८मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु, तो सपशेल खोटा ठरला आहे. मराठवाड्यात आजही १४० महसूल मंडळामध्ये गंभीर पाणीटंचाई व दुष्काळ आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५पैकी ५६ मंडळे कोरडीठाक आहेत. परभणी जिल्ह्यातील ३८पैकी ८ ते १० मंडळांमध्ये जेमतेम पाऊस आहे. जालना जिल्ह्यामध्येसुद्धा ५५पैकी ७ मंडळांमध्ये मध्यम पाऊस आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात १६ दिवस, जुलै महिन्यामध्ये १३ दिवस व आॅगस्ट महिन्यात एकही दिवस पाऊस झालेला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने खत, बियाणे, औषधी उत्पादक कंपन्यांकडून विविध प्रकारचे पॅकेज घेऊन व शेअर बाजरातून उलाढाल वाढविण्यासाठी चुकीची माहिती महाराष्ट्र शासन व शेतकºयांना दिली आहे. आशिया खंडातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. अशा चुकीच्या माहितीमुळे हा आकडा रोज वाढत आहे. त्यामुळे या बाबींची चौकशी करून हवामान खात्याच्या संचालकांवर भादंवि ४२०नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे.