शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

शेतकरी अपघात विमा योजनेचे ४१ प्रस्ताव कंपनीने फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अंपगत्व आल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा विमा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयास देण्याची गोपीनाथ मुंडे शेतकरी ...

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अंपगत्व आल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा विमा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयास देण्याची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यात अंमलात आली आहे. या योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अपूर्ण कागदपत्रांच्या कारणावरून विमा कंपनीकडून दावे मंजूर केले जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे केली होती. यानुसार त्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांत परभणी जिल्ह्यात या योजनेंतर्गत २१३ प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल करण्यात आले. त्यापैकी १०८ प्रस्तावांना कंपनीने मंजुरी दिली आहे. विविध कारणांमुळे २१ प्रस्ताव कंपनीने फेटाळले आहेत. त्यामध्ये २०१७-१८ मधील ३२ प्रस्तावांचा समावेश आहे. कंपनीकडे २२ प्रस्ताव कार्यवाहीसाठी प्रलंबित असून कागदपत्रांअभावी ४२ प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

या कारणांसाठी मिळते शेतकऱ्यांना मदत

वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात.

राज्यात १९ ऑगस्ट २००४ रोजी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. २६ नोव्हेंबर २०१५ रोजी या योजनेचे नामकरण ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना’ असे झाले.

कोणाला किती मिळते मदत?

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख, अपघातामुळे १ डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीने विविध कागदपत्रांच्या कारणांवरून प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुुळे पात्र शेतकरी व त्यांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तसेच दिरंगाई करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

-आ.बाबाजानी दुर्राणी

परभणी