शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेचे ४१ प्रस्ताव कंपनीने फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अंपगत्व आल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा विमा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयास देण्याची गोपीनाथ मुंडे शेतकरी ...

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अंपगत्व आल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा विमा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयास देण्याची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यात अंमलात आली आहे. या योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अपूर्ण कागदपत्रांच्या कारणावरून विमा कंपनीकडून दावे मंजूर केले जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे केली होती. यानुसार त्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांत परभणी जिल्ह्यात या योजनेंतर्गत २१३ प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल करण्यात आले. त्यापैकी १०८ प्रस्तावांना कंपनीने मंजुरी दिली आहे. विविध कारणांमुळे २१ प्रस्ताव कंपनीने फेटाळले आहेत. त्यामध्ये २०१७-१८ मधील ३२ प्रस्तावांचा समावेश आहे. कंपनीकडे २२ प्रस्ताव कार्यवाहीसाठी प्रलंबित असून कागदपत्रांअभावी ४२ प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

या कारणांसाठी मिळते शेतकऱ्यांना मदत

वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात.

राज्यात १९ ऑगस्ट २००४ रोजी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. २६ नोव्हेंबर २०१५ रोजी या योजनेचे नामकरण ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना’ असे झाले.

कोणाला किती मिळते मदत?

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख, अपघातामुळे १ डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीने विविध कागदपत्रांच्या कारणांवरून प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुुळे पात्र शेतकरी व त्यांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तसेच दिरंगाई करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

-आ.बाबाजानी दुर्राणी

परभणी