शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शेतकरी अपघात विमा योजनेचे ४१ प्रस्ताव कंपनीने फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अंपगत्व आल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा विमा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयास देण्याची गोपीनाथ मुंडे शेतकरी ...

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अंपगत्व आल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा विमा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयास देण्याची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यात अंमलात आली आहे. या योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अपूर्ण कागदपत्रांच्या कारणावरून विमा कंपनीकडून दावे मंजूर केले जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे केली होती. यानुसार त्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांत परभणी जिल्ह्यात या योजनेंतर्गत २१३ प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल करण्यात आले. त्यापैकी १०८ प्रस्तावांना कंपनीने मंजुरी दिली आहे. विविध कारणांमुळे २१ प्रस्ताव कंपनीने फेटाळले आहेत. त्यामध्ये २०१७-१८ मधील ३२ प्रस्तावांचा समावेश आहे. कंपनीकडे २२ प्रस्ताव कार्यवाहीसाठी प्रलंबित असून कागदपत्रांअभावी ४२ प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

या कारणांसाठी मिळते शेतकऱ्यांना मदत

वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात.

राज्यात १९ ऑगस्ट २००४ रोजी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. २६ नोव्हेंबर २०१५ रोजी या योजनेचे नामकरण ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना’ असे झाले.

कोणाला किती मिळते मदत?

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख, अपघातामुळे १ डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीने विविध कागदपत्रांच्या कारणांवरून प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुुळे पात्र शेतकरी व त्यांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तसेच दिरंगाई करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

-आ.बाबाजानी दुर्राणी

परभणी