शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

दिव्यागांच्या तक्रार निवारणासाठी ३ स्तरावर समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST

केंद्र शासनाने दिव्यांग हक्क कायदा १७ एप्रिल २०१७ पासून देशात लागू केला आहे. या अनुषंगाने २५ जून २०१८ रोजी ...

केंद्र शासनाने दिव्यांग हक्क कायदा १७ एप्रिल २०१७ पासून देशात लागू केला आहे. या अनुषंगाने २५ जून २०१८ रोजी एक आदेश काढून पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून उपलब्ध झालेल्या ५ टक्के निधीची रक्कम दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनांसाठी खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही काही संस्था हा ५ टक्के निधी ठरवून देण्यात आलेल्या निकषानुसार खर्च करीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अनुषंगाने येणाऱ्या दिव्यांगाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आत ग्राम, तालुका व जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामस्तरावरील समितीचे तक्रार निवारण अधिकारी म्हणून ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार कर्त्याचे समाधान न झाल्यास त्यांना ३० दिवसांच्या आत पंचायत स्तरावरील अधिकऱ्यांकडे अपील करता येणार आहे. तालुका स्तरावर तक्रार निवारण अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून समाधान न झाल्यास तक्रारदाराला ३० दिवसांच्या आत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे. जिल्हा स्तरीय समितीचे अध्यक्ष जि. चे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. या समितीचे सचिव पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य वित्त लेख अधिकारी हे या समितीचे सदस्य राहणार आहेत. या समितीची दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बैठक होणार आहे. या समितीकडे आलेली तक्रारींचे निवारण ४५ दिवसांत करणे क्रमप्राप्त आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दिव्यांगांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.