ग्रामीण भागाची आर्थिक वाहिनी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीसाठी महत्त्वपूर्ण बँक मानली जाते. शासनाच्या विविध योजना, अनुदान या बँकेच्या माध्यामातूनच शेतकऱ्यांपर्यंत वितरित केले जाते. त्याचप्रमाणे परभणी आणि हिंगोली अशा दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असूून या जिल्ह्यांमध्ये बँकेच्या दीडशेपेक्षा अधिक शाखा आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात घेण्यााठी राजकीय क्षेत्रात चुरस निर्माण होते. बँकेच्या निवडणुकीसाठी तयारीही सुरू झाली आहे. पॅनल गठित केले जात असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापणार आहे.
अनर्हता दिनांकासंदर्भात होते अपील
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक वर्ष उशिराने जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा अर्हता दिनांक बदलून मिळावा, नवीन संस्था मतदानापासून वंचित राहू नये, अर्हता दिनांक बदलून या संस्थांनाही मतदानाचा अधिकार द्यावा, या आशयाची याचिका न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत ही याचिका फेटाळल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘जिल्हा बँकेच्या संदर्भात दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र त्यासंदर्भातील अधिकृत आदेश प्राप्त झाला नाही. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर आदेशानुसार पुढील प्रक्रिया होईल’.- मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक