शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात ‘वन-वे’ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:48 IST

परभणी : वाहतुकीची वर्दळ अधिक असणारे शहरातील काही रस्ते वन-वे केले असतानाही त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू ...

परभणी : वाहतुकीची वर्दळ अधिक असणारे शहरातील काही रस्ते वन-वे केले असतानाही त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू असल्याने सातत्याने वाहतूक खोळंबत असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे.

परभणी शहरातील स्टेशनरोड, अष्टभूजा देवी मंदिर चौक, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर, वसमतरोड, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा जोतिबा फुले चौक या दरम्यानच्या रस्त्यांवर वाहनांची अधिक वर्दळ असल्याने सुरळीत वाहतुकीसाठी ते वन-वे करण्यात आले आहेत. असे असताना गेल्या महिन्यांपासून या संदर्भातील नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने विरुद्ध दिशेने सातत्याने वाहनधारक ये-जा करीत आहेत. परिणामी वाहतुकीवर परिणाम होत आहे.

वसमत रस्त्यावर विरुद्ध दिशेने ये-जा

शहरातील वसमत रस्ता हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. असे असताना शिवशक्ती बिल्डिंग परिसरातील रस्त्यावरून विरुद्ध दिशेने सर्रास वाहनधारक ये-जा करीत आहेत. याशिवाय काळी कमान परिसरातही रस्त्याच्या बाजूला असलेली भाजीखरेदी करण्यासाठीही विरुद्ध मार्गाचा अवलंब करून वाहनधारक रहदारी करीत असतात.

जिल्हा बँकेसमोरील रस्त्यावरही अशीच स्थिती

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यासमोरील रस्ता हा पूर्णत: वन-वे असताना या बँकेतून येणारे वाहनधारक थेट विरुद्ध दिशेने महात्मा फुले चौकाकडे येतात. अशा वेळी या चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या दिशेने जाणारे वाहनधारकही जात असल्याने अनेक वेळा किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.

नारायण चाळ भागातही कोंडी

शहरातील बाजारपेठेत जाण्यासाठी असलेल्या नारायण चाळ भागात एकेकाळी वन-वे रस्ता होता. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत राहत होती. आता मात्र या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनधारक ये-जा करीत असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच नारायण चाळ ते महात्मा जोतिबा फुले चौक यादरम्याच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती गरजेची

शहरात ज्या ठिकाणी वन-वे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्या प्रत्येक रस्त्यांवर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी नारायण चाळ, गांधी पार्क, शिवाजी चौक, काळी कमान आदी भागांत पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत होती. आता मात्र या भागात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिसत नाहीत. त्यामुळे वाहनधारक सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व किरकोळ अपघाताचे प्रकार होत आहेत. शहर वाहतूक शाखेने ही बाब गांभीर्याने घेऊन वन-वेच्या नियमांचे शहामध्ये तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.