शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

परभणी शहरात ‘वन-वे’ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:48 IST

परभणी : वाहतुकीची वर्दळ अधिक असणारे शहरातील काही रस्ते वन-वे केले असतानाही त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू ...

परभणी : वाहतुकीची वर्दळ अधिक असणारे शहरातील काही रस्ते वन-वे केले असतानाही त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू असल्याने सातत्याने वाहतूक खोळंबत असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे.

परभणी शहरातील स्टेशनरोड, अष्टभूजा देवी मंदिर चौक, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर, वसमतरोड, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा जोतिबा फुले चौक या दरम्यानच्या रस्त्यांवर वाहनांची अधिक वर्दळ असल्याने सुरळीत वाहतुकीसाठी ते वन-वे करण्यात आले आहेत. असे असताना गेल्या महिन्यांपासून या संदर्भातील नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने विरुद्ध दिशेने सातत्याने वाहनधारक ये-जा करीत आहेत. परिणामी वाहतुकीवर परिणाम होत आहे.

वसमत रस्त्यावर विरुद्ध दिशेने ये-जा

शहरातील वसमत रस्ता हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. असे असताना शिवशक्ती बिल्डिंग परिसरातील रस्त्यावरून विरुद्ध दिशेने सर्रास वाहनधारक ये-जा करीत आहेत. याशिवाय काळी कमान परिसरातही रस्त्याच्या बाजूला असलेली भाजीखरेदी करण्यासाठीही विरुद्ध मार्गाचा अवलंब करून वाहनधारक रहदारी करीत असतात.

जिल्हा बँकेसमोरील रस्त्यावरही अशीच स्थिती

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यासमोरील रस्ता हा पूर्णत: वन-वे असताना या बँकेतून येणारे वाहनधारक थेट विरुद्ध दिशेने महात्मा फुले चौकाकडे येतात. अशा वेळी या चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या दिशेने जाणारे वाहनधारकही जात असल्याने अनेक वेळा किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.

नारायण चाळ भागातही कोंडी

शहरातील बाजारपेठेत जाण्यासाठी असलेल्या नारायण चाळ भागात एकेकाळी वन-वे रस्ता होता. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत राहत होती. आता मात्र या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनधारक ये-जा करीत असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच नारायण चाळ ते महात्मा जोतिबा फुले चौक यादरम्याच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती गरजेची

शहरात ज्या ठिकाणी वन-वे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्या प्रत्येक रस्त्यांवर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी नारायण चाळ, गांधी पार्क, शिवाजी चौक, काळी कमान आदी भागांत पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत होती. आता मात्र या भागात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिसत नाहीत. त्यामुळे वाहनधारक सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व किरकोळ अपघाताचे प्रकार होत आहेत. शहर वाहतूक शाखेने ही बाब गांभीर्याने घेऊन वन-वेच्या नियमांचे शहामध्ये तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.