शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST

लॉकडाऊन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नोकरीच नसल्याने विवाह लांबणीवर टाकण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले. परिणामी नोंदणी विवाह कमी झाले ...

लॉकडाऊन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नोकरीच नसल्याने विवाह लांबणीवर टाकण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले. परिणामी नोंदणी विवाह कमी झाले आहेत.

दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ६५ विवाह नोंदणी पद्धतीने होतात. मात्र, कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हे प्रमाण निम्म्याने घटले आहे. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांनंतर दरवर्षीच नोंदणीत वाढ होत असते.

- के. आर. मोरे,

विवाह नोंदणी अधिकारी

लॉकडाऊनमध्ये एकही नोंदणी नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यवहार बंद राहिले.

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांत एकाही विवाहाची नोंद झाली नाही. त्यापूर्वीच्या महिन्यांत मात्र नोंदणी झालेली आहे.

विवाह टाकले लांबणीवर

लॉकडाऊन काळात काही युवकांना नोकरी गमवावी लागली. मोठ्या शहरातील कंपन्यांमध्ये नोकरी करणारे हे युवक गावाकडे परतले होते.

नोकरीच नाही तर विवाह करायचा कसा, असा प्रश्न या युवकांना सतावत होता. त्यामुळे कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर नवीन कंपनी जॉईन करून त्यानंतरच विवाहाचे पाहू, असा विचार करून अनेकांनी विवाह लांबणीवर टाकले. त्याचाही परिणाम या काळातील विवाह नोंदणीत घट होण्यावर झाला आहे.

आर्थिक अडचणींचाही विचार

कोरोना संसर्ग काळात युवकांना नोकरी गमवावी लागल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणीही उभ्या ठाकल्या. त्यामुळे या काळात विवाह केल्यास या समस्या आणखीच वाढतील. असाही विचार करून अनेकांनी आपले विवाह लांबणीवर टाकले.