शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात एकीकडे थाटामाटात विवाहांना बंदी असताना दुसरीकडे बालविवाहाचे प्रकार मात्र वाढले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये ...

परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात एकीकडे थाटामाटात विवाहांना बंदी असताना दुसरीकडे बालविवाहाचे प्रकार मात्र वाढले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये बालविवाहाच्या अनुषंगाने एकूण तीन गुन्हे दाखल असून बालकल्याण समिती व चाईल्ड लाईनने २८ विवाह थांबविले आहेत.

कोरोनाच्या संसर्ग काळात शाळा दोन वर्षांपासून बंद आहेत. ग्रामीण भागात नववी इयत्तेनंतर १० वीच्या वर्षात प्रवेश घेण्याऐवजी थेट मुलींचे विवाह लावून देण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे मुलींचे वय १८वर्ष पूर्ण झालेले नसतानाच तिचा विवाह लावला जातो. कोरोनामुळे आर्थिक समस्या वाढली असल्याने मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत तिचा विवाह करुन जबाबदारीतून मुक्त होण्याची पालकांची मानसिकता असते. यातूनच जिल्ह्यात बालविवाह वाढले आहेत.

...तर दाखल होतो गुन्हा

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे विवाह लावल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद कायद्यात आहे. असे बालविवाह होऊ नयेत, यासाठी सामाजिक संस्था कार्य करतात. विवाह मोडण्याऐवजी तो थांबविण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यात दोन वर्षांत असे २८ विवाह थांबविले आहेत.

शाळांमधील घटली संख्या

कोरोना काळात बंद असलेल्या शाळा मागील आठवड्यात सुरु झाल्या आहेत. नववी इयत्तेची पटसंख्या दहावी इयत्तेत मात्र कमी झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित झालेले नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या वाढणे अपेक्षित असताना ती मात्र वाढलेली नाही.

दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र

नववी इयत्तेतून उत्तीर्ण होऊन दहावीमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थिनींचे विवाह लावण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातच हा प्रकार अधिक असल्याने जनजागृतीची गरज आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण

कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे मुलीच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करीत तिचे लग्न लवकर लावून देण्याचे प्रकार घडले आहेत.