शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

प्रस्थापितांना नाकारत मतदारांनी केले परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:18 IST

तालुक्यामध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा आहे. तो ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ...

तालुक्यामध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा आहे. तो ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी पाहावयास मिळाला. अनेक ठिकाणी बोर्डीकर विरुद्ध भांबळे असाच सामना झाला. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच अत्यंत चुरशीच्या व निर्णायक लढती पाहावयास मिळाल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या ग्रामपंचायतीच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. चारठाणा सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला खाते उघडता आले नाही. आडगाव सारखी मोठी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातातून गेली. असे असताना भाजपाच्या प्रतिष्ठेची केलेली बोरी ग्रामपंचायत मात्र राष्ट्रवादीने मोठे मताधिक्य ठेवत आपल्याकडेच ठेवली. याशिवायही धमधम येथील ग्रामपंचायत,

सावंगी म्हाळसा ग्रामपंचायती भाजपासाठी जमेच्या ठरल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विजय भांबळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळेच काही ठिकाणच्या ग्रामपंचायती राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. उलट मतदारसंघात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायतीतील कार्यकर्त्यांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी भाजपाची परिस्थिती मतदारसंघात सुधारत असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये मागच्या वर्षी असणारी सत्ता उलथून टाकत मतदारांनी नवीन लोकांच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या दिल्या. प्रस्थापितांना नाकारणारी ही निवडणूक असावी असाच काहीसा कयास जिंतूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून दिसून येतो.

अनेक ठिकाणी लक्ष्मी अस्त्र चालले नाही

तालुक्यातील वीस ते पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये अतिशय अटीतटीच्या चुरशीच्या तसेच नातेवाईकांमध्ये अटीतटीच्या निवडणुका झाल्या. याठिकाणी एका मताचा भाव पाच हजारापासून पंधरा हजारापर्यंत गेला होता. असे असतानाही अनेक ठिकाणी मात्र लक्ष्मी अस्त्र डावलून मतदारांनी दुसऱ्याच उमेदवाराची निवड केल्याचे चित्र दिसत आहे.