शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

केंद्राची योजना; परभणीत कामकाज सुरु : ‘आयुष्यमान’साठी दीड लाख लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:25 IST

केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत देशभरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविली जाणार आहे. या योजनेचे कामकाज जिल्ह्यात सुरु झाले असून जिल्हा प्रशासनाने एमईसीएसच्या सर्व्हेक्षणानुसार १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची योजनेसाठी आॅनलाईन नोंदणी करुन घेतली आहे. या योजनेंतर्गत १ हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रत्येक कुटुंबाला आरोग्यासाठी प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. योजनेत समाविष्ट झालेल्या कुटुंबांना ई-कार्ड दिले जाणार असून देशभरातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सध्या राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित असून या जोडीलाच केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत किरकोळ व मोठ्या आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती- जमातीचे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला प्रमुख असलेले कुटुंब या योजनेचे लाभार्थी असतील. तर शहरी भागामध्ये कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर लघु व्यवसाय करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक, सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, हॉटेल वेटर, मॅकेनिक, वीज तंत्री, धोबी, चौकीदार या वर्गातील कुटुंब योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.आजपासून जिल्ह्यात प्रारंभप्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा २३ सप्टेंबर रोजी देशभरात एकाच वेळी प्रारंभ केला जाणार आहे. भारत सरकारच्या वतीने झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा प्रारंभ केला जाणार असून परभणी जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेचे अधिकृत उद्घाटन केले जाणार आहे. लाभार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जावेद अथर यांनी केले आहे.५ लाखांचे विमा संरक्षणया योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या लाभार्थी कुटुंबियांना ५ लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तसेच अशा कुटुंबातील सुमारे १ हजार १२२ आजारांवर देशातील कोणत्याही शासनमान्य रुग्णालयांमध्ये उपचार करुन दिले जाणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधान