शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केंद्राची योजना; परभणीत कामकाज सुरु : ‘आयुष्यमान’साठी दीड लाख लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:25 IST

केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत देशभरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविली जाणार आहे. या योजनेचे कामकाज जिल्ह्यात सुरु झाले असून जिल्हा प्रशासनाने एमईसीएसच्या सर्व्हेक्षणानुसार १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची योजनेसाठी आॅनलाईन नोंदणी करुन घेतली आहे. या योजनेंतर्गत १ हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रत्येक कुटुंबाला आरोग्यासाठी प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. योजनेत समाविष्ट झालेल्या कुटुंबांना ई-कार्ड दिले जाणार असून देशभरातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सध्या राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित असून या जोडीलाच केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत किरकोळ व मोठ्या आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती- जमातीचे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला प्रमुख असलेले कुटुंब या योजनेचे लाभार्थी असतील. तर शहरी भागामध्ये कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर लघु व्यवसाय करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक, सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, हॉटेल वेटर, मॅकेनिक, वीज तंत्री, धोबी, चौकीदार या वर्गातील कुटुंब योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.आजपासून जिल्ह्यात प्रारंभप्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा २३ सप्टेंबर रोजी देशभरात एकाच वेळी प्रारंभ केला जाणार आहे. भारत सरकारच्या वतीने झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा प्रारंभ केला जाणार असून परभणी जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेचे अधिकृत उद्घाटन केले जाणार आहे. लाभार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जावेद अथर यांनी केले आहे.५ लाखांचे विमा संरक्षणया योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या लाभार्थी कुटुंबियांना ५ लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तसेच अशा कुटुंबातील सुमारे १ हजार १२२ आजारांवर देशातील कोणत्याही शासनमान्य रुग्णालयांमध्ये उपचार करुन दिले जाणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधान