शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

परभणीत प्रशासनाची बेफिकीरी अन्‌ नागरिकांचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:30 IST

परभणी : कोणत्याही नियमांचे पालन न करता होत असलेली थेट गर्दी, प्रशासनाची बेफिकीरी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे जिल्ह्यात पुन्हा ...

परभणी : कोणत्याही नियमांचे पालन न करता होत असलेली थेट गर्दी, प्रशासनाची बेफिकीरी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग डोके वर काढत आहे. मागील आठवड्यात ४९ वर असलेली रुग्ण संख्या आता थेट १२१ वर पोहोचली आहे. डिसेंबर महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. कोरोनाच्या तपासण्या वाढविल्यानंतरही रुग्णांचे प्रमाण मात्र कमी राहिले. त्यामुळे नागरिक चांगलेच निश्चिंत झाले. परिणामी मास्कचा वापर न करता जिल्हाभर वावरणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करता लग्न सोहळ्यांचा धडका जिल्ह्यात सुरू झाला. लग्न सोहळ्यात केवळ १०० नागरिकांच्या उपस्थिती बंधनकारक असताना मागच्या आठवड्यात ५०० ते ७०० वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पडले. याबाबत सोशल मीडियात ओरड होऊनही जिल्हा प्रशासनाने कसलीही कारवाई केली नाही. मनपानेही ना कारवाई केली ना नोटिसा दिल्या. त्यामुळे परिस्थिती अलबेल झाली आणि हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. दररोज १० ते १५ रुग्ण नोंद असताना मागच्या तीन दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या २० पेक्षा अधिक गेली. मागच्या तीन दिवसांत ६८ नव्या रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.