शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

उमेदवारांची घरपट्टी,पाणीपट्टी भरताना पॅनल प्रमुखांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींतून ३३९ सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण ...

तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींतून ३३९ सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण भरलेली असणे अनिवार्य आहे. तसेच त्यांच्याकडे शौचालय असणे अनिवार्य आहे. उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरतानाच त्यांना घरपट्टी व पाणीपट्टी थकीत नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष्यांचा पाहिजे तेवढा हस्तक्षेप नसतो. गावातीलच स्थानिक पुढारी पॅनेल उभे करून निवडणूक लढवितात. निवडून येण्याची पात्रता असलेला उमेदवार आपल्याच पॅनलमध्ये आणण्यासाठी पॅनल प्रमुखांची धडपड सुरू असते. सद्य:स्थितीत गावागावात पॅनल उभे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो व त्याला पॅनलमध्ये कसे आणायचे याची मोर्चेबांधणी पॅनल प्रमुखांकडून सुरू आहे. पॅनलमध्ये असणाऱ्या उमेदवाराकडे घरपट्टी व पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे ती भरण्याची जबाबदारी पॅनल प्रमुखावर येऊन पडली आहे. ७ सदस्य असलेल्या गावांत ७० ते ८० हजार तर ९ पेक्षा जास्त सदस्य असलेल्या गावांत १ लाखाच्या वर घरपट्टी व पाणीपट्टी भरावी लागत आहे. यासोबतच पॅनलमधील उमेदवारांचा खर्चही पॅनल प्रमुखांनी करावा, असा आग्रह उमेदवारांकडून धरला जातो. गावातील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असते. यामुळे या निवडणुकीत पॅनल प्रमुखांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. गावात आपले पॅनल निवडून यावे यासाठी पॅनल प्रमुख जोरदार तयारी करत असल्याचे चित्र तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये दिसून येत आहे.

शौचालय स्वयंघोषणा पत्राचा निव्वळ फार्स

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना घरात शौचालय असल्याबाबतचे स्वयंघोषणा पत्र द्यावे लागते. यामध्ये उमेदवार मालकीच्या घरात राहत असून शौचालय आहे. शौचालयाचा वापर करतो. तसेच भाड्याच्या घरात राहत असून घरात शौचालय आहे व त्याचा नियमित वापर करतो. घरात शौचालय नाही मात्र सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो. असे लिहून द्यावे लागत आहे. उमेदवारांनी काही लिहून दिले तरी त्याची तपासणी किंवा चौकशी संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शौचालयाची सोय घोषणापत्र निव्वळ निवडणुकीत फार्स ठरत आहे.

सोमवारपासून अर्ज दाखल करण्यासाठी होणार गर्दी

तालुक्यात २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी २३ आणि २४ डिसेंबर या दोन दिवसांत तालुक्यात केवळ २ अर्ज दाखल झाले आहेत. २५,२६,२७ डिसेंबर रोजी सुटी आल्याने इच्छुक उमेदवारांना २८, २९, ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यामुळे या तीन दिवसांत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे.