शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

तब्बल २१ तासानंतर सापडला बुडालेल्या बालिकेचा मृतदेह

By admin | Updated: October 12, 2016 23:48 IST

उस्वद : दुर्गा विसर्जनासाठी पूर्णा नदीवर गेलेल्या बालिकेचा मंगळवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तब्बल २१ तासानंतर तिचा मृतदेह शोधण्यात ग्रामस्थांना यश आले

उस्वद : दुर्गा विसर्जनासाठी पूर्णा नदीवर गेलेल्या बालिकेचा मंगळवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तब्बल २१ तासानंतर तिचा मृतदेह शोधण्यात ग्रामस्थांना यश आले. दरम्यान, प्रशासनाला कळवूनही कोणीच न आल्याने ग्रामस्थांना वैशालीचा मृतदेह सापडण्यासाठी कसरत करावी लागली.वैशाली (११) व आरती प्रल्हाद वाणी (१३ रा.उस्वद ता.मंठा) या बहिणी मंगळवारी नवरात्रोत्साच्या निमित्ताने दुर्गा विसर्जन करण्यासाठी पूर्णा नदीवर गेल्या होत्या. यातच वैशाली ही मुर्ती विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरली. परंतु अचाणक पाण्याचा प्रवाह आल्याने तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि वाहून गेली. सोबत असलेल्या आरतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तिला अपयश आले. ती घाबरलेल्या अवस्थेत गावाकडे धाव घेत आरडाओरडा केला. तात्काळ ग्रामस्थ व तरूणांनी नदीकडे धाव घेत वैशालीचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांना तिचा मृतदेह सापडला नाही.दरम्यान, घटना घडताच ग्रामस्थांनी मंठा पोलिस ठाणे आणि तहसीलदार यांना फोनवरून कल्पना देत मदतीची मागणी केली. यावर पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी आणि तलाठी हे दाखल झाले. परंतु मृतदेह सापडण्यासाठी कोणतीच यंत्रणा आली नाही. यंत्रणेच्या हालगर्जीपणाला कंटाळून तरूण वैशालीचा मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा नदी पात्रात उतरले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना वैशालीचा मृतदेह सापडण्यात यश आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव झाला होता. जमावाला दुर करण्यासाठी पोलिस यंत्रणाही कुचकामी ठरली. मंठा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.नातेवाईक आक्रमकप्रशासनाकडे मदतीसाठी वारंवार मागणी केल्यानंतरही ते वेळेवर न आल्याने वैशालीच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतु गावातील काही ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मदतीसाठी उशिर का झाला याबाबत चौकशीची मागणी केली. (वार्ताहर)