शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

सावधान! ६ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात तपासलेल्या ...

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात तपासलेल्या ३ हजार ८७८ नमुन्यांपैकी सहा नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना राज्य शासन राबवित आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील दूषित निघालेल्या सहा गावांतील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याने ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहेत.

पाणी नमुने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

जिल्हा आरोग्य विभागाकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जातात. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ७०४ गावांतील ३ हजार ८७८ पाणी नमुने एप्रिल महिन्यात तपासण्यात आल्याचे पाणी नमुने सर्वेक्षण विभागाने सांगितले.

दुसरीकडे पाथरी तालुक्यात जून महिन्यात तपासणी करण्यात आलेल्या ५९ पाणी नमुन्यांपैकी ४ गावांतील पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. तर वर्षभरात एकूण ३३६ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३६ पाणी नमुने दूषित आढळून आले तर जिल्हा आरोग्य विभागाच्या एप्रिल महिन्याच्या अहवालात ४३८ नमुने तपासण्यात आले. त्यातील एकही दूषित आढळून आला नसल्याने या पाणी नमुने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कोरोनामळे नमुने घेण्यास अडचण

n जिल्हा आरोग्य विभागाकडून दर महिन्याला ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील पाणी नमुने तपासले जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावातील पाणी नमुदे तपासण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.

n त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने एप्रिल २०२१ मध्ये पाणी नमुने सर्वेक्षण करण्यात आले.

n त्यामध्ये ३ हजार ८७८ नमुन्यांपैकी केवळ सहा नमुने दूषित आढळून आले.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

n ग्रामीण भागात बहुतांश पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरी या नदी, ओढ्यांच्या काठी आहेत. त्यामुळे या नदी व ओढ्यांना पूर आल्यानंतर पुराचे पाणी या विहिरींमध्ये जाते.

n ग्रामीण भागात खाजगी विहिरी, बोअर या जलस्रोतांजवळ मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचते.

n बहुतांश जलस्रोतांजवळून गावातील नाल्या वाहतात. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी पिताना ते पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पूर्णा तालुका अग्रेसर

n जिल्हा आरोग्य विभागाकडून पाणी नमुने सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पूर्णा तालुक्यातील ६२५ नमुन्यांची तपासणी केली.

n त्यामध्ये ५ नमुने दूषित आढळून आले. जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक नमुने दूषित आढळले.