शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ६ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात तपासलेल्या ...

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात तपासलेल्या ३ हजार ८७८ नमुन्यांपैकी सहा नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना राज्य शासन राबवित आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील दूषित निघालेल्या सहा गावांतील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याने ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहेत.

पाणी नमुने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

जिल्हा आरोग्य विभागाकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जातात. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ७०४ गावांतील ३ हजार ८७८ पाणी नमुने एप्रिल महिन्यात तपासण्यात आल्याचे पाणी नमुने सर्वेक्षण विभागाने सांगितले.

दुसरीकडे पाथरी तालुक्यात जून महिन्यात तपासणी करण्यात आलेल्या ५९ पाणी नमुन्यांपैकी ४ गावांतील पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. तर वर्षभरात एकूण ३३६ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३६ पाणी नमुने दूषित आढळून आले तर जिल्हा आरोग्य विभागाच्या एप्रिल महिन्याच्या अहवालात ४३८ नमुने तपासण्यात आले. त्यातील एकही दूषित आढळून आला नसल्याने या पाणी नमुने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कोरोनामळे नमुने घेण्यास अडचण

n जिल्हा आरोग्य विभागाकडून दर महिन्याला ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील पाणी नमुने तपासले जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावातील पाणी नमुदे तपासण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.

n त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने एप्रिल २०२१ मध्ये पाणी नमुने सर्वेक्षण करण्यात आले.

n त्यामध्ये ३ हजार ८७८ नमुन्यांपैकी केवळ सहा नमुने दूषित आढळून आले.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

n ग्रामीण भागात बहुतांश पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरी या नदी, ओढ्यांच्या काठी आहेत. त्यामुळे या नदी व ओढ्यांना पूर आल्यानंतर पुराचे पाणी या विहिरींमध्ये जाते.

n ग्रामीण भागात खाजगी विहिरी, बोअर या जलस्रोतांजवळ मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचते.

n बहुतांश जलस्रोतांजवळून गावातील नाल्या वाहतात. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी पिताना ते पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पूर्णा तालुका अग्रेसर

n जिल्हा आरोग्य विभागाकडून पाणी नमुने सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पूर्णा तालुक्यातील ६२५ नमुन्यांची तपासणी केली.

n त्यामध्ये ५ नमुने दूषित आढळून आले. जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक नमुने दूषित आढळले.