शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सहकाराच्या लढाईत सेनेची कमाई तर राष्ट्रवादीची हाराकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने एकतर्फी बाजी मारली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर यांची ...

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने एकतर्फी बाजी मारली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर यांची अध्यक्षपदी तर हिंगोलीतील शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर यांची उपाध्यक्षपदी मागील आठवड्यात बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता या निवडणुकीचा राजकीय पक्षाकडून लेखाजोखा घेतला जात आहे. निवडणुकीतील राजकीय डावपेच आणि सत्तेसाठी खेळलेल्या चाली लक्षात घेता शिवसेनेसाठी ही निवडणूक फायद्याची ठरली आहे. परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी आतापर्यंत जिल्हा बँकेत मात्र सेनेची एंट्री झाली नव्हती. यावेळी खा. बंडू जाधव आणि परभणीचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत सहकार क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. पक्षाचे तीन संचालक निवडून आणले. शिवाय उपाध्यक्षपदही मिळविले. यासाठी काँग्रेसचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या चाणक्यनीतीचा शिवसेनेला फायदा झाला. शिवाय काँग्रेसही प्लसमध्येच राहिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र अधिक अपेक्षेतून हाराकिरी स्वीकारावी लागली. या निवडणुकीत पक्षाचे दोन गट पडले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी एका जागेवरून बँकेच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवत वरपुडकरांची साथ सोडून भाजपाचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. निवडणूक निकालात बोर्डीकरांच्या पॅनलला बहुमत मिळू शकले नाही. तरीही राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून आल्यामुळे त्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा होती. यातून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवार यांनीही त्यांना हिरवी झेंडी दाखविली असल्याचे आ. दुर्राणी म्हणाले. त्यामुळे त्यांनी आपणास जो अध्यक्षपद देईल त्यालाच पाठिंबा देऊ, अशी घोषणा केली; परंतु, 'सियासत की अपनी अलग इक जबां है, लिखा हो जो इकरार इन्कार पढना है।' या प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांच्या ओळींचा आ. दुर्राणी यांना विसर पडला आणि ऐन मतदानाच्या दिवशीच सकाळी पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी परभणीत येऊन वरपुडकरांसोबत जाण्याचा दादांचा निरोप असल्याचे दुर्राणी यांना सांगितले. त्यामुळे आ. दुर्राणी नाराज होऊन निवडणूक प्रक्रियेसाठी न थांबता सरळ पाथरीला निघून गेले. त्यानंतर या निवडणुकीतील हवाच निघाली. परिणामी वरपुडकर व गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वाला प्रसिद्ध गीतकार व शायर जावेद अख्तर म्हणतात त्याप्रमाणे 'कभी जो ख्वाब था वो पाल लिया है, मगर जो खो गई वो चीज क्या थी।' याचा विचार करावा लागेल.