शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराच्या लढाईत सेनेची कमाई तर राष्ट्रवादीची हाराकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने एकतर्फी बाजी मारली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर यांची ...

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने एकतर्फी बाजी मारली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर यांची अध्यक्षपदी तर हिंगोलीतील शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर यांची उपाध्यक्षपदी मागील आठवड्यात बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता या निवडणुकीचा राजकीय पक्षाकडून लेखाजोखा घेतला जात आहे. निवडणुकीतील राजकीय डावपेच आणि सत्तेसाठी खेळलेल्या चाली लक्षात घेता शिवसेनेसाठी ही निवडणूक फायद्याची ठरली आहे. परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी आतापर्यंत जिल्हा बँकेत मात्र सेनेची एंट्री झाली नव्हती. यावेळी खा. बंडू जाधव आणि परभणीचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत सहकार क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. पक्षाचे तीन संचालक निवडून आणले. शिवाय उपाध्यक्षपदही मिळविले. यासाठी काँग्रेसचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या चाणक्यनीतीचा शिवसेनेला फायदा झाला. शिवाय काँग्रेसही प्लसमध्येच राहिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र अधिक अपेक्षेतून हाराकिरी स्वीकारावी लागली. या निवडणुकीत पक्षाचे दोन गट पडले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी एका जागेवरून बँकेच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवत वरपुडकरांची साथ सोडून भाजपाचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. निवडणूक निकालात बोर्डीकरांच्या पॅनलला बहुमत मिळू शकले नाही. तरीही राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून आल्यामुळे त्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा होती. यातून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवार यांनीही त्यांना हिरवी झेंडी दाखविली असल्याचे आ. दुर्राणी म्हणाले. त्यामुळे त्यांनी आपणास जो अध्यक्षपद देईल त्यालाच पाठिंबा देऊ, अशी घोषणा केली; परंतु, 'सियासत की अपनी अलग इक जबां है, लिखा हो जो इकरार इन्कार पढना है।' या प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांच्या ओळींचा आ. दुर्राणी यांना विसर पडला आणि ऐन मतदानाच्या दिवशीच सकाळी पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी परभणीत येऊन वरपुडकरांसोबत जाण्याचा दादांचा निरोप असल्याचे दुर्राणी यांना सांगितले. त्यामुळे आ. दुर्राणी नाराज होऊन निवडणूक प्रक्रियेसाठी न थांबता सरळ पाथरीला निघून गेले. त्यानंतर या निवडणुकीतील हवाच निघाली. परिणामी वरपुडकर व गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वाला प्रसिद्ध गीतकार व शायर जावेद अख्तर म्हणतात त्याप्रमाणे 'कभी जो ख्वाब था वो पाल लिया है, मगर जो खो गई वो चीज क्या थी।' याचा विचार करावा लागेल.