शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

बी.रघुनाथ हे मराठी मातीचे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

परभणी : कविवर्य बी. रघुनाथ यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे असून, प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले आहे ...

परभणी : कविवर्य बी. रघुनाथ यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे असून, प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले आहे म्हणूनच बी.रघुनाथ हे केवळ परभणीचेच नव्हे तर मराठी मातीचे वैभव आहेत, असे प्रतिपादन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.

थोर साहित्यीक कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त महानगर पालिकेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी म.न.पा. आयुक्त देविदास पवार, पत्रकार आसाराम लोमटे, मसापचे रमाकांत कुलकर्णी, सरोजताई देशपांडे, प्रा. अशोक जोंधळे, उदय वाईकर, नागेश कुलकर्णी, दिनकर देशपांडे, अरुण चव्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. भालेराव म्हणाले, बी. रघुनाथ यांचा स्मृती दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो, ही अभिनंदनीय बाब आहे. आयुक्त देविदास पवार यांनी प्रास्ताविक केले.

ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी नवीन वाचकांना व संशोधकांना निजामकालीन मराठवाडा व त्या काळच्या लेखाजोखा अभ्यासण्यासाठी बी. रघुनाथांचे साहित्य फार मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे, असे प्रतिपादन केले. प्रा. अशोक जोंधळे यांनी ‘सांज’ ह्या कवितेचे भावपूर्ण सादरीकरण केले. उदय वाईकर यांनी ‘आज कुणाला गावे’ ही कविता सादर केली. तर ‘निळावंतीची लावणी’ ह्या कथेचे नागेश कुलकर्णी यांनी नाट्यअभिवाचन केले. तसेच "ते न तिने कधी ओळखले" कविता दिनकर देशपांडे यांनी सादर केली. बालराज्यनाट्य स्पर्धेतील गुणी कलाकार कु.श्रीया लव्हेकर हिचा सत्कार करण्यात आला. राजकुमार जाधव यांनी उपस्थित साहित्यिकांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी प्रमोद बल्लाळ, संजय पांडे, रामेश्वर कुलकर्णी, किशन पैके, कैलास काकडे, भगवान पावडे, नगरसचिव विकास रत्नपारखी व युवराज साबळे आदींनी प्रयत्न केले.

पुष्पा बनसोडे व ईखतियार पठाण यांनी सूत्रसंचालन केले.