शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

बी.रघुनाथ हे मराठी मातीचे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

परभणी : कविवर्य बी. रघुनाथ यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे असून, प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले आहे ...

परभणी : कविवर्य बी. रघुनाथ यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे असून, प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले आहे म्हणूनच बी.रघुनाथ हे केवळ परभणीचेच नव्हे तर मराठी मातीचे वैभव आहेत, असे प्रतिपादन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.

थोर साहित्यीक कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त महानगर पालिकेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी म.न.पा. आयुक्त देविदास पवार, पत्रकार आसाराम लोमटे, मसापचे रमाकांत कुलकर्णी, सरोजताई देशपांडे, प्रा. अशोक जोंधळे, उदय वाईकर, नागेश कुलकर्णी, दिनकर देशपांडे, अरुण चव्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. भालेराव म्हणाले, बी. रघुनाथ यांचा स्मृती दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो, ही अभिनंदनीय बाब आहे. आयुक्त देविदास पवार यांनी प्रास्ताविक केले.

ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी नवीन वाचकांना व संशोधकांना निजामकालीन मराठवाडा व त्या काळच्या लेखाजोखा अभ्यासण्यासाठी बी. रघुनाथांचे साहित्य फार मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे, असे प्रतिपादन केले. प्रा. अशोक जोंधळे यांनी ‘सांज’ ह्या कवितेचे भावपूर्ण सादरीकरण केले. उदय वाईकर यांनी ‘आज कुणाला गावे’ ही कविता सादर केली. तर ‘निळावंतीची लावणी’ ह्या कथेचे नागेश कुलकर्णी यांनी नाट्यअभिवाचन केले. तसेच "ते न तिने कधी ओळखले" कविता दिनकर देशपांडे यांनी सादर केली. बालराज्यनाट्य स्पर्धेतील गुणी कलाकार कु.श्रीया लव्हेकर हिचा सत्कार करण्यात आला. राजकुमार जाधव यांनी उपस्थित साहित्यिकांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी प्रमोद बल्लाळ, संजय पांडे, रामेश्वर कुलकर्णी, किशन पैके, कैलास काकडे, भगवान पावडे, नगरसचिव विकास रत्नपारखी व युवराज साबळे आदींनी प्रयत्न केले.

पुष्पा बनसोडे व ईखतियार पठाण यांनी सूत्रसंचालन केले.