शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न; नागरिकांनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला

By ज्ञानेश्वर भाले | Updated: November 28, 2023 19:12 IST

पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती.

परभणी : पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती. यात आमच्यावर अन्याय झाला म्हणून दोघांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यादरम्यान दुपारी गोंधळ उडाल्याने अधिकारी, कर्मचारी हैराण झाले होते. या घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी संबंधितांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

राहट गट क्रमांक १३/२/ब/अ/ मध्ये पाच एकर ११ गुंठे जमिनीबाबत कुळाचा दावा कनिष्ठ न्यायालय पालम यांनी नामंजूर केला आहे. यासह तहसीलदारांनी सुद्धा कुळ कायदा जमिनीची नोंद कुठेही आढळून येत नसल्याचा आदेश दिला आहे. याबाबत चुकीचा निर्णय असल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याची तक्रार संजय रोहिदास गायकवाड, चंद्रकांत भगावान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली हाेती. २३ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीत जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर २८ नोव्हेंबरला कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच अंगावर डिझेल टाकून स्वत: पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांसह, कर्मचऱ्यांनी त्यांना थांबल्याने पुढील अनर्थ टळला. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत ठाण्यात घेऊन गेले.

संबंधित प्रकरण काय आहे, यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी संबंधितांना आपल्या दालनात बोलावून त्यांची बाजू समजून घेतली. यासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा महसूल आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे आले.न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्नपरभणी : पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती. यात आमच्यावर अन्याय झाला म्हणून दोघांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यादरम्यान दुपारी गोंधळ उडाल्याने अधिकारी, कर्मचारी हैराण झाले होते. या घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी संबंधितांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

राहट गट क्रमांक १३/२/ब/अ/ मध्ये पाच एकर ११ गुंठे जमिनीबाबत कुळाचा दावा कनिष्ठ न्यायालय पालम यांनी नामंजूर केला आहे. यासह तहसीलदारांनी सुद्धा कुळ कायदा जमिनीची नोंद कुठेही आढळून येत नसल्याचा आदेश दिला आहे. याबाबत चुकीचा निर्णय असल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याची तक्रार संजय रोहिदास गायकवाड, चंद्रकांत भगावान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली हाेती. २३ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीत जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर २८ नोव्हेंबरला कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच अंगावर डिझेल टाकून स्वत: पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांसह, कर्मचऱ्यांनी त्यांना थांबल्याने पुढील अनर्थ टळला. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत ठाण्यात घेऊन गेले.

संबंधित प्रकरण काय आहे, यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी संबंधितांना आपल्या दालनात बोलावून त्यांची बाजू समजून घेतली. यासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा महसूल आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे आले.