शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न; नागरिकांनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला

By ज्ञानेश्वर भाले | Updated: November 28, 2023 19:12 IST

पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती.

परभणी : पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती. यात आमच्यावर अन्याय झाला म्हणून दोघांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यादरम्यान दुपारी गोंधळ उडाल्याने अधिकारी, कर्मचारी हैराण झाले होते. या घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी संबंधितांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

राहट गट क्रमांक १३/२/ब/अ/ मध्ये पाच एकर ११ गुंठे जमिनीबाबत कुळाचा दावा कनिष्ठ न्यायालय पालम यांनी नामंजूर केला आहे. यासह तहसीलदारांनी सुद्धा कुळ कायदा जमिनीची नोंद कुठेही आढळून येत नसल्याचा आदेश दिला आहे. याबाबत चुकीचा निर्णय असल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याची तक्रार संजय रोहिदास गायकवाड, चंद्रकांत भगावान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली हाेती. २३ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीत जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर २८ नोव्हेंबरला कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच अंगावर डिझेल टाकून स्वत: पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांसह, कर्मचऱ्यांनी त्यांना थांबल्याने पुढील अनर्थ टळला. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत ठाण्यात घेऊन गेले.

संबंधित प्रकरण काय आहे, यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी संबंधितांना आपल्या दालनात बोलावून त्यांची बाजू समजून घेतली. यासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा महसूल आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे आले.न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्नपरभणी : पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती. यात आमच्यावर अन्याय झाला म्हणून दोघांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यादरम्यान दुपारी गोंधळ उडाल्याने अधिकारी, कर्मचारी हैराण झाले होते. या घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी संबंधितांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

राहट गट क्रमांक १३/२/ब/अ/ मध्ये पाच एकर ११ गुंठे जमिनीबाबत कुळाचा दावा कनिष्ठ न्यायालय पालम यांनी नामंजूर केला आहे. यासह तहसीलदारांनी सुद्धा कुळ कायदा जमिनीची नोंद कुठेही आढळून येत नसल्याचा आदेश दिला आहे. याबाबत चुकीचा निर्णय असल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याची तक्रार संजय रोहिदास गायकवाड, चंद्रकांत भगावान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली हाेती. २३ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीत जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर २८ नोव्हेंबरला कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच अंगावर डिझेल टाकून स्वत: पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांसह, कर्मचऱ्यांनी त्यांना थांबल्याने पुढील अनर्थ टळला. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत ठाण्यात घेऊन गेले.

संबंधित प्रकरण काय आहे, यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी संबंधितांना आपल्या दालनात बोलावून त्यांची बाजू समजून घेतली. यासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा महसूल आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे आले.