शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

घरफोड्या करणारे अट्टल चोरटे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:18 IST

परभणी : दोन वर्षांपासून घरफोडी, चोरी, दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, ...

परभणी : दोन वर्षांपासून घरफोडी, चोरी, दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींनी जिल्ह्यातील २३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपींकडून ८ तोळे सोने, ४४ तोळे चांदी आणि नगदी असा ७ लाख ३० हजार रुपयांचा मु्द्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.

पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी १८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोडी, चोरी, दरोड्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने अट्टल चोरटे असलेल्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. अतिशय सूक्ष्म तपास करून हे यश मिळविले.

पालम तालुक्यातील बनवस येथे १२ जुलै रोजी झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्यासह पथकाची स्थापना करण्यात आली. हे पथक माहिती घेत असताना १७ जुलै रोजी परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात पाल ठोकून राहणाऱ्या सुरेश उर्फ गुप्ता जगदीश उर्फ शंकर शिंदे (रा. करमतांडा, ता. सोनपेठ) यास अटक करून त्याच्याकडून ११ तोळे सोने व नगदी रक्कम असा ६ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या आरोपीचे साथीदार असलेल्या इतर दोन आरोपींना १४ सप्टेंबर रोजी परळी तालुक्यातील पांगरी येथून ताब्यात घेतले. अंबू उर्फ शिवराज जगदीश उर्फ शिंदे व एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. या दोन आरोपींनी इतर आरोपींच्या मदतीने दैठणा, पिंपळदरी, पूर्णा, सोनपेठ, गंगाखेड, पालम आदी ठिकाणी २३ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे, असे पोलीस अधीक्षक मीना यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पालम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, उपनिरीक्षक साईनाथ पुयड, संतोष सिरसेवाड, सहायक उपनिरीक्षक हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तूपसुंदरे, सुग्रीव केंद्रे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, दिलावर पठाण, शेख अजहर, किशोर चव्हाण, हरी खुपसे, सय्यद मोबीन, गौस पठाण, संतोष सानप, शेख रफीक, पिराजी निळे, संजय घुगे आदींनी केली.

आणखी एका टोळीचा तपास सुरू