शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मयत प्राध्यापकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST

गंगाखेड : ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून मयत प्राध्यापकाची नियुक्ती निवडणूक विभागाने करून २६ डिसेंबर रोजी झालेल्या प्रशिक्षण ...

गंगाखेड : ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून मयत प्राध्यापकाची नियुक्ती निवडणूक विभागाने करून २६ डिसेंबर रोजी झालेल्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याची नोटीसही या प्राध्यापकाच्या नावे काढली आहे. त्यामुळे निवडणूक विभाग प्रशासनाचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

गंगाखेड तालुक्यात ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामंपचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, अर्ज भरण्याचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्याअनुषंगाने निवडणूक विभागही कामाला लागला आहे. ग्रामपंचायत मतदान अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या स्वाक्षरीने काही प्राध्यापक व शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी शहरातील साई वृंदावन कार्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याची नोटीसही काढण्यात आली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांच्या स्वाक्षरीने मयत प्राध्यापकाच्या नावे नोटीस काढण्यात आली. विशेष म्हणजे मतदान अधिकारी म्हणून निवडणूक प्रशिक्षण शिबिरास अनुपस्थित राहिल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला. प्राध्यापक हाश्मी सय्यद रफीक सय्यद तमीज यांचे २१ मार्च २०२० रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते संत जनाबाई कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. निवडणूक विभागाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अद्ययावत याद्या शाळेतून मागविल्या नसल्याचे या प्रकारातून समोर येत आहे. १५ जानेवारी रोजी तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक विभागाच्या या अजब कारभारामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

...तर घडला नसता प्रकार

तालुक्यातील शाळांतून निवडणूक विभागाला शिक्षकांच्या याद्या मागविताना मुख्याध्यापक, शिक्षकांचे नाव, पदनाम, बेसिक पगार, जन्मतारीख नेमणूक तारीख आणि सेवानिवृत्तीचा दिनांक अशी परिपूर्ण माहिती दिली जाते. या यादीतील निवृत्ती होणाऱ्या शिक्षकांची नावे न पाहताच निवडणूक कामावर हजर राहण्याची नोटीस या विभागाकडून पाठविली जात आहे. निवडणूक कामासाठी असणारे कर्मचारी पारदर्शकता न ठेवता सरळ तहसीलदारांच्या स्वाक्षरीने नोटीस पाठवत आहेत. शाळेतून आलेल्या प्रत्येक यादीची छाननी करून निवडणूक मतदान अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली असती तर हा प्रकार घडला नसता, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.