शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पाथरीत १४ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

पाथरी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी होत असून, निवडणुकीसाठी ५९३ कर्मचाऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ...

पाथरी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी होत असून, निवडणुकीसाठी ५९३ कर्मचाऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १४ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २८ सहायक यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढल्याने तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतच्या सरपंचांची मुदत संपल्यानंतर या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. जुलै ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने निवडणूक विभागाने ग्रामपंचायतीचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

४२ ग्रामपंचायतींसाठी १४ निवडणूक निर्णय अधिकारी तसेच त्यांना प्रत्येकी २ सहायक याप्रमाणे २८ कर्मचारी मिळून ४२ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांची १८ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाची माहिती देण्यात आली.

तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींसाठी १३५ मतदान केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर ४ कर्मचारी प्रमाणे ५४० कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेसाठी अलर्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर अतिरिक्त ७० कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याने निवडणूक विभागाने एकूण ५९३ कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त केली आहे.

बॉक्स

राखीव जागेतून ग्रामपंचायतची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात पडताळणी प्रस्ताव १५ ए वर संबंधित ग्रामपंचायतसाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात हालचाली वाढल्या

कोविड १९ च्या काळात रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आता ग्रामीण भागात निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुका गट तट यावर बऱ्यापैकी अवलंबून असल्याने चुरस पहावयास मिळणार असल्याचे दिसत आहे.

३७० सदस्य निवडले जाणार

४२ ग्रामपंचायतमधून ३७० सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी ६७ हजार ५०० मतदार असून यात महिला मतदार ३२ हजार १९८ तर पुरुष मतदार ३५ हजार ३०० आहेत. २ मतदार तृतीयपंथी आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार ए. एन. नवघिरे यांनी दिली.