शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या अनुदानाचे आणखी ९० कोटी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने जिल्ह्याला दुसरा व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. हा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात जून ते ऑक्टाेबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे १४ गावांमधील १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी १५ लाख ८४ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यापैकी ९० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात दिला होता. आता दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ कोटी ३५ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दराने ६ हजार ८०्० रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर दराने देण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे. तसेच वाढीव दराने शेती पिकांसाठी ३ हजार २०० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी ७ हजार रुपये प्रतिहेक्टरनुसार जिल्ह्याला २८ कोटी ८५ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा मिळालेला ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश दिनांक ७ जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढले आहेत. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, तो तालुका स्तरावर वितरीत करण्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता हा निधी तालुका स्तरावरून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काही दिवसात जमा होणार आहे.

३३ टक्के नुकसानग्रस्तांना मदत

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले, त्यांनाच ही मदत जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १० हजार रुपये तर बागायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत घोषित करण्यात आले. मात्र, असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या निकषाप्रमाणे मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत.