शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

अतिवृष्टीच्या अनुदानाचे आणखी ९० कोटी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने जिल्ह्याला दुसरा व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. हा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात जून ते ऑक्टाेबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे १४ गावांमधील १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी १५ लाख ८४ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यापैकी ९० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात दिला होता. आता दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ कोटी ३५ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दराने ६ हजार ८०्० रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर दराने देण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे. तसेच वाढीव दराने शेती पिकांसाठी ३ हजार २०० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी ७ हजार रुपये प्रतिहेक्टरनुसार जिल्ह्याला २८ कोटी ८५ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा मिळालेला ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश दिनांक ७ जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढले आहेत. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, तो तालुका स्तरावर वितरीत करण्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता हा निधी तालुका स्तरावरून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काही दिवसात जमा होणार आहे.

३३ टक्के नुकसानग्रस्तांना मदत

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले, त्यांनाच ही मदत जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १० हजार रुपये तर बागायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत घोषित करण्यात आले. मात्र, असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या निकषाप्रमाणे मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत.