शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

अतिवृष्टीच्या अनुदानाचे आणखी ९० कोटी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने जिल्ह्याला दुसरा व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. हा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात जून ते ऑक्टाेबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे १४ गावांमधील १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी १५ लाख ८४ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यापैकी ९० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात दिला होता. आता दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ कोटी ३५ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दराने ६ हजार ८०्० रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर दराने देण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे. तसेच वाढीव दराने शेती पिकांसाठी ३ हजार २०० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी ७ हजार रुपये प्रतिहेक्टरनुसार जिल्ह्याला २८ कोटी ८५ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा मिळालेला ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश दिनांक ७ जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढले आहेत. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, तो तालुका स्तरावर वितरीत करण्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता हा निधी तालुका स्तरावरून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काही दिवसात जमा होणार आहे.

३३ टक्के नुकसानग्रस्तांना मदत

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले, त्यांनाच ही मदत जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १० हजार रुपये तर बागायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत घोषित करण्यात आले. मात्र, असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या निकषाप्रमाणे मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत.