शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या अनुदानाचे आणखी ९० कोटी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने जिल्ह्याला दुसरा व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. हा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात जून ते ऑक्टाेबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे १४ गावांमधील १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी १५ लाख ८४ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यापैकी ९० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात दिला होता. आता दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ कोटी ३५ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दराने ६ हजार ८०्० रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर दराने देण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे. तसेच वाढीव दराने शेती पिकांसाठी ३ हजार २०० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी ७ हजार रुपये प्रतिहेक्टरनुसार जिल्ह्याला २८ कोटी ८५ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा मिळालेला ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश दिनांक ७ जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढले आहेत. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, तो तालुका स्तरावर वितरीत करण्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता हा निधी तालुका स्तरावरून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काही दिवसात जमा होणार आहे.

३३ टक्के नुकसानग्रस्तांना मदत

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले, त्यांनाच ही मदत जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १० हजार रुपये तर बागायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत घोषित करण्यात आले. मात्र, असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या निकषाप्रमाणे मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत.