शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीसीआयने अडवली सेझची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST

मानवत : यंदाच्या कापूस हंगामात सीसीआयने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र ...

मानवत : यंदाच्या कापूस हंगामात सीसीआयने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र सेझची रक्कम कमी केल्याचा वादातून बाजार समितीला मिळणारी रक्कम सीसीआयने अडवल्याने बाजार समिती आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

२० नोव्हेंबरपासून सीसीआयने हमीदाराने कापसाची खरेदी सुरू केली होती. पर जिल्ह्यासह जिल्हाभरातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र दिसून येत होते. दररोज ८०० ते ९०० वाहन बाजार समितीचे यार्डात येऊ लागले. नोव्हेंबर, डिसेंबर तसेच जानेवारी या तीन महिन्यांत शेतकरी मानवत केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत होते. दररोज दहा हजार क्विंटल आवकची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे होत होती. ३० जानेवारीपर्यंत सीसीआयने तीन लाख ९४ हजार कापसाची हमीदराने खरेदी केली. मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कापसामध्ये टप्प्याटप्प्याने भाव वाढ होत असल्याचे चित्र दिसून आले. भाववाढीचा परिणाम सीसीआईच्या खरेदीवर झाला होता. यामुळे सीसीआयचे केंद्रप्रमुख शंकरलाल गलगठ यांनी १३ फेब्रुवारीपासून सीसीआयची कापूस खरेदी कायमस्वरूपी बंद केली. दरम्यान, सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाचा सेझ मिळावा, यासाठी बाजार समितीने जानेवारी महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला. मात्र आर्थिक वर्ष संपले तरी सीसीआयने बाजार समितीच्या सेझची रक्कम दिली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मानवत बाजार समितीसह जिल्ह्यात ज्या बाजार समितीच्या यार्डात सीसीआयची खरेदी झाली आहे. अशा सर्व बाजार समितीला अद्यापही सेझची रक्कम न मिळाल्याने या बाजार समिती ही आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

बॉक्स

सेझ ५० टक्के कमी केल्याने वाद

कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्डात कापूस खरेदी केल्याबद्दल १ रुपया १० पैसे याप्रमाणे सीसीआय बाजार समितीला बाजार फी देत असते. मात्र यावर्षी सीसीआयने या बाजार समितीला देण्यात येणाऱ्या सेझमध्ये ५० टक्के घट केली आहे. सीसीआयने पत्र काढून ५५ पैसे प्रमाणे बाजार फीची रक्कम देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र या निर्णयाला बाजार समितीने विरोध केला आहे. बाजार फीची रक्कम कमी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन, व्यवस्थापन, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा यावर परिणाम होणार आहे. बाजार समितीचा डोलारा चालवणे अवघड होणार आहे.त्यामुळे पूर्वीप्रमाणे १ रुपया ५ पैसेप्रमाणे बाजार फीस सीसीआयने द्यावी, अशी मागणी बाजार समित्याकडून होत आहे.

एक कोटींचा फटका

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. १ रुपया ५ पैसे प्रमाणे २ कोटी २५ लाख रुपये फीस मिळाली असती. मात्र सीसीआयच्या निर्णयामुळे ५५ पैसे प्रमाणे केवळ १ कोटी १२ लाख रुपये मिळतील. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नाला एक कोटींचा फटका बाजार समितीला बसणार आहे. यामुळे मानवत बाजार समितीसह औरंगाबाद विभागातील ४८ बाजार समित्यांचा या निर्णयाला कडाडून विरोध होत असल्याचे चित्र आहे.