शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

युती-आघाडीत जागा बदलावरून पेच, अंतर्गत मतभेदातून दोन्हीकडे बंडखोरीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 04:19 IST

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील काही जागांची आदलाबदल करण्यावरुन शिवसेना- भाजप युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत पेच निर्माण झाला

- अभिमन्यू कांबळेपरभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील काही जागांची आदलाबदल करण्यावरुन शिवसेना- भाजप युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत पेच निर्माण झाला असून, या प्रकरणात वरिष्ठांमार्फत जरी हस्तक्षेप झाला तरी बंडखोरी अटळ आहे. लोकसभा निवडणुकीत १९९१ पासून ८ पैकी ७ वेळा शिवसेनेने विजय मिळविला असला तरी विधानसभेला बदल झाल्याचे पहावयास मिळाले आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत १ लाख २७ हजार मतांनी शिवसेनेने विजय मिळविल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ६ पैकी केवळ एका जागेवर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविता आला होता.तर दोन जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. या दोन्ही जागा कायम ठेवण्यासाठी राष्टÑवादीला कसरत करावी लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीतील कामावरुन जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. गंगाखेडचे आ. डॉ. मधुसूदन केंद्रे आणि लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांचे समर्थक थेट मुंबईतील बैठकीतच भिडल्याने पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. विधानसभेला पक्षाची उमेदवारी या आशेवर गंगाखेडचे माजी आ. सीताराम घनदाट यांनी लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार विटेकर यांचे काम केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यमान आ. डॉ. केंद्रे यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. यातून निर्माण झालेले मतभेद अद्यापही कायम आहेत.गंगाखेड मतदारसंघ युतीत रासपकडे आहे. या पक्षाचे उपाध्यक्ष रत्नाकर गुट्टे हे कर्ज फसवणूक प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. ही संधी साधून भाजपकडून या जागेवर दावा केला जात आहे. दुसरीकडे शिवसेनाही या जागेवर लढण्याची तयारी करीत आहे. वंचित आघाडीचीही येथून तयारी सुरु आहे. याशिवाय पाथरी विधानसभा मतदारसंघातही युती आणि आघाडीत बेबनाव आहे. आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला होती; परंतु, आता राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांच्याशी ही जागा मागितली आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची अडचण झाली आहे. युतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे आहे; परंतु, येथून अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. मोहन फड हे शिवसेनामार्गे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुुळे ही जागा शिवसेनेकडून सोडून भाजपकडे घ्यावी, यासाठी ते आपली ताकद पणाला लावत आहेत. दुसरीकडे आ. फड यांनी लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे खा. बंडू जाधव हे ही जागा भाजपला सोडायला तयार नाहीत. त्यामुळे हा पेच मुंबईहूनच सुटू शकतो.जिंतूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादीचे आ. विजय भांबळे हे करीत आहेत. यावेळीही त्यांच्यासमोर माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचे आव्हान असेल. २०१४ च्या निवडणुकीत बोर्डीकर हे काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपमध्ये आले आहेत. युतीच्या जागा वाटपानुसार जिंतूरची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडायला शिवसेना नेते तयार नाहीत. सेनेचे जि.प.तील गटनेते राम खराबे यांनी गेल्यावेळी येथून निवडणूक लढविली होती. यामुळे युतीत या जागेवरुनही टिष्ट्वस्ट कायम आहे. या मतदारसंघात काँग्रेसची फारसी ताकद नाही. वंचित बहुजन आघाडीकडून मात्र येथे अनेक जण इच्छूक आहेत. परभणी मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी एमआयएमचे उमेदवार सय्यद खालेद सय्यद साहेबजान यांचा पराभव केला होता; परंतु, भाजपचे उमेदवार आनंद भरोसे यांनी तिसऱ्या क्रमांकाची लक्षणीय मते मिळविली होती. आता पुन्हा एकदा भरोसे यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. यावरुन शिवसेना-भाजपमध्ये गेल्या महिन्यात आरोप-प्रत्यारोप झाले. विशेष म्हणजे येथे आ़ डॉ़ पाटील व खा़ जाधव यांच्यात टोकाचे मतभेद आहेत़ दुसरीकडे आघाडीतील जागा वाटपावरुन परभणीची जागा काँग्रेसकडे आहे; परंतु, राष्ट्रवादीने या जागेची मागणी वरिष्ठांकडे लावून धरली आहे. शिवाय परभणी मनपात काँग्रेस सत्ताधारी आहे तर राष्ट्रवादी सभापतीपद मिळवत विरोधी पक्षात आहे. त्यामुळे आघाडीतील बेबनाव कायम आहे. परिणामी परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीत मतभेद असल्याने विधानसभा निवडणुकी दरम्यान बंडखोरी होण्याची शक्यता आहे. यातीलच काही जण वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे आघाडीचे नेते सांगत आहेत.>सर्वाधिक मताधिक्याने विजयजिंतूर : विजय भांबळे (राष्ट्रवादी): २७,३५८सर्वात कमी मताने विजयगंगाखेड : डॉ. मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी) २,२८९