शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:33 IST

परभणी : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, ५५ वर्षांनंतर शेतकऱ्यांना ...

परभणी : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, ५५ वर्षांनंतर शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळणार असल्याचे प्रतिपादन कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केवळ ओरड केली जात होती. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात तीन कृषी कायदे अमलात आणले. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना देशभरात कोठेही आपला शेतमाल विकता येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी संधी मिळणार असून, १० हजार उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर १ लाख कोटी रुपये खर्च करून शेतीसंदर्भात सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. आंदोलनकर्त्यांनी एमएसपीसाठी आंदोलन सुरू केले. मात्र, आता सरकार चर्चेसाठी तयार असताना हे तिन्ही कायदे रद्द करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन कृषी कायद्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे पाशा पटेल म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, बाळासाहेब भालेराव यांच्यासह भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.