शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:33 IST

परभणी : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, ५५ वर्षांनंतर शेतकऱ्यांना ...

परभणी : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, ५५ वर्षांनंतर शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळणार असल्याचे प्रतिपादन कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केवळ ओरड केली जात होती. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात तीन कृषी कायदे अमलात आणले. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना देशभरात कोठेही आपला शेतमाल विकता येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी संधी मिळणार असून, १० हजार उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर १ लाख कोटी रुपये खर्च करून शेतीसंदर्भात सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. आंदोलनकर्त्यांनी एमएसपीसाठी आंदोलन सुरू केले. मात्र, आता सरकार चर्चेसाठी तयार असताना हे तिन्ही कायदे रद्द करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन कृषी कायद्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे पाशा पटेल म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, बाळासाहेब भालेराव यांच्यासह भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.