शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:33 IST

परभणी : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, ५५ वर्षांनंतर शेतकऱ्यांना ...

परभणी : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, ५५ वर्षांनंतर शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळणार असल्याचे प्रतिपादन कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केवळ ओरड केली जात होती. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात तीन कृषी कायदे अमलात आणले. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना देशभरात कोठेही आपला शेतमाल विकता येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी संधी मिळणार असून, १० हजार उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर १ लाख कोटी रुपये खर्च करून शेतीसंदर्भात सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. आंदोलनकर्त्यांनी एमएसपीसाठी आंदोलन सुरू केले. मात्र, आता सरकार चर्चेसाठी तयार असताना हे तिन्ही कायदे रद्द करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन कृषी कायद्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे पाशा पटेल म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, बाळासाहेब भालेराव यांच्यासह भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.