शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात प्रशासनाची मदत कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:21 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. शेतकरी कुटुंबियांना शासनाची मदत देण्याच्या उद्देशाने अहवालही तयार केला; परंतु, प्रशासनाचा हा ‘मायेचा ओलावा’ कोरडाच ठरला असून दोन महिन्यानंतरही एकाही कुटुंबियांना मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाची मदत कागदावरच राहते की काय? अशी शंका निर्माण होत आहे.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. शेतकरी कुटुंबियांना शासनाची मदत देण्याच्या उद्देशाने अहवालही तयार केला; परंतु, प्रशासनाचा हा ‘मायेचा ओलावा’ कोरडाच ठरला असून दोन महिन्यानंतरही एकाही कुटुंबियांना मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाची मदत कागदावरच राहते की काय? अशी शंका निर्माण होत आहे.२०१२ ते २०१७ या कालावधीत आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार १८ नोव्हेंबर २०१७ रोजी या शेतकरी कुटुंबियांचे सर्र्वेक्षण करण्यात आले. एक प्रश्नावली तयार करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची आर्थिक स्थिती, त्यांचे उत्पन्नाचे साधन याविषयीची माहिती एकत्रित करुन या कुटुंबियांना प्रशासकीय स्तरावरुन काय मदत केली जाऊ शकते, याचा अंदाज घेण्यात आला. शेतकरी कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांना प्राधान्यक्रमाने शासकीय योजनांचा लाभ देण्याचेही निश्चित करण्यात आले.पाथरी तालुक्यात पाच वर्षात ५० शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल महसूल यंत्रणेकडे प्राप्त झाला. या अहवालाआधारे शासनाच्या १८ योजनांसाठी लाभार्थी म्हणून कुटुंबियांची निवडही करण्यात आली. शासन निकषानुसार या कुटुंबियांना तत्काळ लाभ देऊन कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांची निवड करुन ती यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली.या सर्वेक्षणाला आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रत्यक्षात एकाही कुटुंबियांपर्यत लाभ पोहोचला नाही. त्यामुळे हे लाभ केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा कुटुंबियांना लागली आहे.महसूल विभागाने त्यांच्या अख्त्यारितील राष्ट्रीय अन्न सुरक्षा व निराधारांचे अनुदान या दोन मुद्यांवर लाभार्थ्यांची निवड केली. मात्र त्याही योजनांचा लाभ मिळालेला नाही.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी सहानुभूतीच्या भावनेतून प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले खरे; परंतु त्यानंतर मदतीसाठी मात्र आखडता हात घेतल्याने प्रशासनाची ही सहानुभूती केवळ कागदोपत्रीच आहे की काय, अशी भावना शेतकरी कुटुंबियांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या तरी शेतकरी कुटुंबिय शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचेच दिसून येत आहे.१८ योजनांच्या याद्या तयारआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या सर्व्हेक्षणानंतर १८ योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कौशल्य विकास, आरोग्य, कर्ज, वैरण विकास, शेतीसाठी वीज, घरगुती वीज जोडणी, सिंचन विहीर, शेततळे, गॅस जोडणी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, हॉस्टेल सुविधा, शौचालय, घरकुल, जनधन, कुटुंब अर्थसहाय्य, निराधार योजना आदी योजनांचा समावेश आहे.पंचायत समितीस्तरावरुन प्रस्तावांची मागणीआत्महत्याग्रस्त कुटुंबियांना लाभ देण्यासाठी पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरीसाठी ४१, वैयक्तिक शौचालयासाठी २७, घरकुलासाठी ३९ लाभार्थ्यांनी मागणी केली असून एकाही कुटुंबाला अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही. या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने पंचायत समितींना सादर करावेत, असे आदेश गटविकास अधिकाºयांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.