शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

परभणी जिल्ह्यात प्रशासनाची मदत कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:21 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. शेतकरी कुटुंबियांना शासनाची मदत देण्याच्या उद्देशाने अहवालही तयार केला; परंतु, प्रशासनाचा हा ‘मायेचा ओलावा’ कोरडाच ठरला असून दोन महिन्यानंतरही एकाही कुटुंबियांना मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाची मदत कागदावरच राहते की काय? अशी शंका निर्माण होत आहे.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. शेतकरी कुटुंबियांना शासनाची मदत देण्याच्या उद्देशाने अहवालही तयार केला; परंतु, प्रशासनाचा हा ‘मायेचा ओलावा’ कोरडाच ठरला असून दोन महिन्यानंतरही एकाही कुटुंबियांना मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाची मदत कागदावरच राहते की काय? अशी शंका निर्माण होत आहे.२०१२ ते २०१७ या कालावधीत आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार १८ नोव्हेंबर २०१७ रोजी या शेतकरी कुटुंबियांचे सर्र्वेक्षण करण्यात आले. एक प्रश्नावली तयार करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची आर्थिक स्थिती, त्यांचे उत्पन्नाचे साधन याविषयीची माहिती एकत्रित करुन या कुटुंबियांना प्रशासकीय स्तरावरुन काय मदत केली जाऊ शकते, याचा अंदाज घेण्यात आला. शेतकरी कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांना प्राधान्यक्रमाने शासकीय योजनांचा लाभ देण्याचेही निश्चित करण्यात आले.पाथरी तालुक्यात पाच वर्षात ५० शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल महसूल यंत्रणेकडे प्राप्त झाला. या अहवालाआधारे शासनाच्या १८ योजनांसाठी लाभार्थी म्हणून कुटुंबियांची निवडही करण्यात आली. शासन निकषानुसार या कुटुंबियांना तत्काळ लाभ देऊन कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांची निवड करुन ती यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली.या सर्वेक्षणाला आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रत्यक्षात एकाही कुटुंबियांपर्यत लाभ पोहोचला नाही. त्यामुळे हे लाभ केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा कुटुंबियांना लागली आहे.महसूल विभागाने त्यांच्या अख्त्यारितील राष्ट्रीय अन्न सुरक्षा व निराधारांचे अनुदान या दोन मुद्यांवर लाभार्थ्यांची निवड केली. मात्र त्याही योजनांचा लाभ मिळालेला नाही.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी सहानुभूतीच्या भावनेतून प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले खरे; परंतु त्यानंतर मदतीसाठी मात्र आखडता हात घेतल्याने प्रशासनाची ही सहानुभूती केवळ कागदोपत्रीच आहे की काय, अशी भावना शेतकरी कुटुंबियांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या तरी शेतकरी कुटुंबिय शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचेच दिसून येत आहे.१८ योजनांच्या याद्या तयारआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या सर्व्हेक्षणानंतर १८ योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कौशल्य विकास, आरोग्य, कर्ज, वैरण विकास, शेतीसाठी वीज, घरगुती वीज जोडणी, सिंचन विहीर, शेततळे, गॅस जोडणी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, हॉस्टेल सुविधा, शौचालय, घरकुल, जनधन, कुटुंब अर्थसहाय्य, निराधार योजना आदी योजनांचा समावेश आहे.पंचायत समितीस्तरावरुन प्रस्तावांची मागणीआत्महत्याग्रस्त कुटुंबियांना लाभ देण्यासाठी पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरीसाठी ४१, वैयक्तिक शौचालयासाठी २७, घरकुलासाठी ३९ लाभार्थ्यांनी मागणी केली असून एकाही कुटुंबाला अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही. या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने पंचायत समितींना सादर करावेत, असे आदेश गटविकास अधिकाºयांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.