शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मोफत वितरणाचे धान्य अद्याप प्रशासनालाच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू ...

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू पात्र कुटुंबीयांना राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अशा लाभार्थींना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील घोषणा १३ एप्रिल रोजी करण्यात आली होती. या घोषणेला १४ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु अद्याप सदरील धान्य जिल्हा पुरवठा विभागाला मिळालेले नाही. त्यामुळे हे धान्य कधी मिळणार, याकडे लाभार्थींचे लक्ष लागले आहे.

मोफत धान्य काय मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे पात्र रेशनकार्डधारकांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मोफत देण्यात येणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी

याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही; परंतु पुरवठा विभागातील सूत्रांनी मोफत वितरणाचे धान्य अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले.

दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे रेशन दुकानातून मोफत धान्य दिले पाहिजे. त्याचाच आता आधार आहे. आणखी किती दिवस सर्वकाही बंद राहणार, हेही निश्चित नाही. त्यामुळे पुढील दोन महिने मोफत धान्य देण्यात यावे.

- अशोकराव गोडबोले

सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे धान्य अद्याप आम्हाला मिळालेले नाही. सध्या हाताला काहीही काम नाही. त्यामुळे रोजच्या जेवणाचा प्रश्न अवघड होत आहे. त्यामुळे सरकारने घोषणा केलेले धान्य तातडीने देण्याची व्यवस्था करावी.

- गुलाबराव सावळे

गेल्या वर्षभरापासून काम मिळणं कठीण होत आहे. मध्ये काही दिवस काम मिळालं होतं. आता दोन महिन्यांपासून पुन्हा सर्व काम बंद झालं आहे. त्यामुळे घर चालवणं अवघड होत आहे. त्यामुळे सरकारनं हे मोफत धान्य लवकर द्यावं. संकटाच्या काळात त्याचीच मदत होणार आहे.

- काशिनाथ साबळे