शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मोफत वितरणाचे धान्य अद्याप प्रशासनालाच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू ...

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू पात्र कुटुंबीयांना राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अशा लाभार्थींना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील घोषणा १३ एप्रिल रोजी करण्यात आली होती. या घोषणेला १४ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु अद्याप सदरील धान्य जिल्हा पुरवठा विभागाला मिळालेले नाही. त्यामुळे हे धान्य कधी मिळणार, याकडे लाभार्थींचे लक्ष लागले आहे.

मोफत धान्य काय मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे पात्र रेशनकार्डधारकांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मोफत देण्यात येणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी

याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही; परंतु पुरवठा विभागातील सूत्रांनी मोफत वितरणाचे धान्य अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले.

दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे रेशन दुकानातून मोफत धान्य दिले पाहिजे. त्याचाच आता आधार आहे. आणखी किती दिवस सर्वकाही बंद राहणार, हेही निश्चित नाही. त्यामुळे पुढील दोन महिने मोफत धान्य देण्यात यावे.

- अशोकराव गोडबोले

सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे धान्य अद्याप आम्हाला मिळालेले नाही. सध्या हाताला काहीही काम नाही. त्यामुळे रोजच्या जेवणाचा प्रश्न अवघड होत आहे. त्यामुळे सरकारने घोषणा केलेले धान्य तातडीने देण्याची व्यवस्था करावी.

- गुलाबराव सावळे

गेल्या वर्षभरापासून काम मिळणं कठीण होत आहे. मध्ये काही दिवस काम मिळालं होतं. आता दोन महिन्यांपासून पुन्हा सर्व काम बंद झालं आहे. त्यामुळे घर चालवणं अवघड होत आहे. त्यामुळे सरकारनं हे मोफत धान्य लवकर द्यावं. संकटाच्या काळात त्याचीच मदत होणार आहे.

- काशिनाथ साबळे