शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

२१ गावांना प्रशासनानेही झिडकारले ऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने दोन हेक्टरची मर्यादा ...

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने दोन हेक्टरची मर्यादा घालून हेक्टरी १० हजारांची मदत जाहीर केली. तालुक्यातील देऊळगाव, कुपटा, चिकलठाणा, सेलू या मंडळातील शेतऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली. परंतु, वालूर मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद नसल्याचे कारण देऊन मंडळातील वालूर, मोरेगाव, कन्हेरवाडी, राजवाडी, डिग्रस बु., डिग्रस खु., काजळी रोहिणा, कवडधन, राजा, डुगरा, ब्राह्मणगाव प्र को, हातनूर, साळेगाव, खेर्डा दुकी, सोन्ना, वलंगवाडी, अंबेगाव डिगर, बोरगाव जहागीर, मोरेगाव, ब्राह्मणगाव प्र प, सोनवटी आणि ब्राह्मणगाव या २१ गावांना अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवले आहे. या मंडळातील लोकप्रतिनिधी, शेतकरी, सामाजिक संस्था आणि विविध पक्षांनी वालूर मंडळातील पिकांचे नुकसान झाल्याने मदत देण्याची मागणी केली. परंतु, शासन स्तरावर या संदर्भात कुठलाच निर्णय होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आश्वासन हवेत

वालूर मंडळातील २१ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान वाटपाच्या मागणीसाठी तालुका दबाव गटाच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी साखळी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १५ दिवसात चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे उपोषणकर्त्याना आश्वासन दिले होते. अद्यापही या बाबतीत कुठलाच निर्णय होत नसल्याने दबाव गटाच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. श्रीकांत वाईकर, जि. प. सदस्य अशोक काकडे, ओमप्रकाश चव्हाळ, अशोक अंभोरे, इसाक पटेल, दिलीप शेवाळे, ॲड. देवराव दळवे, ॲड. योगेश सूर्यवंशी, लक्ष्मण प्रधान, मधुकर सोळंके यांची उपस्थिती होती.