शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

फूस लावून आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:22 IST

शहरी भागात थोडीशी तोंड ओळख झाली की त्यास मैत्रीचे नाव दिले जाते. अज्ञान व अल्पव्यात बौद्धिक क्षमता नसल्याने अनेकांचे ...

शहरी भागात थोडीशी तोंड ओळख झाली की त्यास मैत्रीचे नाव दिले जाते. अज्ञान व अल्पव्यात बौद्धिक क्षमता नसल्याने अनेकांचे निर्णय ही चचुकतात. २० अक्टोबर २०२० रोजीच्या पहाटे घरातून बाहेर पडलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातून गायब झाली. आईने तिचा शोध घेतला परंतु, सापडली नाही. चौकशी दरम्यान ती त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलासह इतर दोघे ज्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. अश्या तिघासोबत गेल्याची बाब पुढे आली. आईने या बाबत दिलेल्या तक्रारीत देवा सागर आगलावे,गणेश वाघमारे व एक अल्पवयीन मुलगी या तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलीचे अपहरण हे पोलिसांपुढे आव्हान होते. तापसधिकारी पोउपनि माणिक गुट्टे, त्यांचे सहकारी समीर पठाण,पोना मिलिंद कांबळे यांनी या घटनेच्या तपासाची चक्रे फिरवली. तिघांच्या संबधामधील मित्र, फोन लोकेशन व नातेवाइकांच्या चौकशी नंतर ते चौघे परभणी येथून पुणे येथे गेल्याचा सुगावा लागला. परंतु, तपासात ते पुढे हैद्राबाद येथे रवाना झाल्याचे कळाले. ते चौघे एक गाव सोडून दुसऱ्या गावाकडे प्रवास करीत असल्याने पोलिसांना तपास लावणे अवघड होतं होते. पंधरा दिवसानंतर त्यांचे लोकेशन हैद्राबाद येथे दाखवत होते. परंतु, त्याचा शोध काही लागत नव्हता. २४ नोव्हेंम्बर रोजी परत आरोपी हे हैद्राबाद लोकेशन मध्ये दाखवत असल्याने पोना मिलिंद कांबळे यांनी हैद्राबाद गाठले. मोबाईल लोकेशन मधील स्थान हे आरोपीच्या बहिणीच्या घराचे निघाले. यातील दोघे हे भोकर येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. भोकर पोलिसांच्या मदतीने आरोपी गणेश वाघमारे व एक अल्पवयीन मुलगी याना पूर्णा येथे आणल्यानंतर त्यांनी दुसरी अल्पवयीन मुलगी व देवा हे सिरसाळा (बीड) येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांना २७ नोव्हेबर रोजी सिरसाळा येथून ताब्यात घेतले.

चुकीच्या निर्णयामुळे आयूष्य उध्वस्त

पूर्णा येथे पीडित मुलीने आपबीती सांगितली. तिने सांगितले की देवा आगलावे यांनी आपणांस पळून जाऊन लग्न करू असे म्हणून नेले होते. हैद्राबाद येथे असताना त्याने आपल्याशी शारीरिक सबंध ठेवल्याचा खुलासा केला. या जवाबा नंतर पूर्वी अपहरणाचा दाखल झालेल्या गुन्ह्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार विरोधी गुन्हा दाखल झाला. पुढे हा तपस पोनि प्रवीण धुमाळ यांच्याकडे वर्ग करण्यात आला. मुलीला तिच्या आईकडे स्वाधीन करण्यात आले. तर दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.बाल वयात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कसे आयुष्य उध्वस्त होते. हे या घटनेतून स्पष्ट होत होते.