शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

परभणी जिल्ह्याततूर उत्पादकांचे दहा कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:13 IST

जिल्ह्यातील ६ हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १५ मार्चपर्यंत १८ हजार ४४३ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप १ हजार १९२ तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे नाफेडकडे जिल्ह्यातील तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. परिणामी तूर उत्पादक अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ६ हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १५ मार्चपर्यंत १८ हजार ४४३ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप १ हजार १९२ तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे नाफेडकडे जिल्ह्यातील तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. परिणामी तूर उत्पादक अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात यावर्षी तूर मोठ्या प्रमाणात उत्पादित झाली आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. तुरीची आवक वाढल्याने खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भावाने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परभणी तालुक्यासाठी शहरातील एमआयडीसी परिसरात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात नाफेडच्या वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर आतापर्यंत २ हजार ४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. १५ मार्चपर्यंत या केंद्रावर १ हजार ९९४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यासाठी जिंतूर शहरात हमीभाव खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून या केंद्रावर आतापर्यंत १ हजार ५३५ शेतकºयांनी नोंदणी केली असून या केंद्रावर सर्वाधिक ५ हजार २७३ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. गंगाखेड केंद्रावर २ हजार ६५७ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत या केंद्रावर ३ हजार ४२० क्विंटल ५० किलोची खरेदी झाली आहे. पूर्णा येथील हमीभाव खरेदी केंद्रावर तालुक्यातील ७६८ तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली असून आतापर्यंत ३ हजार ४९ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर २ हजार ६२६ तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली असून १५ मार्चपर्यंत ४६७ क्विंटल तुरीची सर्वात कमी खरेदी झाली आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक २ हजार ९२६ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत ४ हजार २३९ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.१५ मार्चपर्यंत नोंदणी केलेल्या १२ हजार तूर उत्पादकांपैकी १ हजार १९२ शेतकºयांची तूर केंद्राच्या वतीने खरेदी करण्यात आली आहे. या तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. त्यामुळे नाफेडकडे थकलेल्या तूर उत्पादकांची देयके तत्काळ देण्यात यावीत, अशी मागणी तूर उत्पादक शेतकºयांतून होत आहे.शुक्रवारच्या पावसाचा बसला फटकाशुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात रिपरिप पाऊस होता. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी झाली नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांना शुक्रवारच्या पावसाचा फटका बसला आहे. पावसाळ्यासाठी तीन महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकºयांना उन्हाळ्यात जमिनीची मशागत करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकºयांतून होत आहे.