शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

विमा कंपनीच्या बनवेगिरीला कंटाळले ७२ हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST

परभणी जिल्ह्यात दरवर्षी ७ लाख ५० हजार शेतकरी पीक विमा भरून आपली पिके संरक्षित करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत ...

परभणी जिल्ह्यात दरवर्षी ७ लाख ५० हजार शेतकरी पीक विमा भरून आपली पिके संरक्षित करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ३२४ रुपयांच्या पीक विम्याचा हप्ता भरून ३ लाख ७६ हजार ८१ हेक्‍टरवरील पिके संरक्षित केली होती. मात्र रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत देताना दुजाभाव केल्याचे दिसून येत आहे. जवळपास संरक्षित केलेल्या सर्वच पिकांचे नुकसान झाले असतानाही या विमा कंपनीने केवळ बोटावर मोजण्याइतकेच शेतकऱ्यांना मदत देऊन ८० कोटी रुपयांचा पीक विमा वाटप केला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून मात्र नुकसानभरपाई देताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी विमा भरणाऱ्या शेतकऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. २०२१-२२ या खरीप हंगामातील ६ लाख २७ हजार ४१२ शेतकऱ्याने ३० कोटी ७० लाख ८१ हजार ३६१ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे. ३ लाख ६१ हजार ७२८ हेक्‍टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७२ हजार ५०० शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देऊनही पाठ फिरवली आहे. त्यामुळे पीकविम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.

क्रॉप इन्शुरन्स ॲप चालेना

जिल्ह्यात मागील आठ दिवसांत अतिवृष्टी सह मोठा पाऊस झाला. त्याचबरोबर दुधना, पूर्णा, गोदावरी, करपरा, लेंडी, फाल्गुनी आदी नद्यांना पूर आल्याने या पुराचे पाणी नदीकाठावरील शेतामध्ये घुसले. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे ७२ तासांच्या आत तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनी ने दिलेल्या क्रॉप इन्शुरन्स ॲपवर प्रयत्न केले. मात्र हे ॲप बंद असून विमा कंपनीने नेमलेल्या प्रतिनिधीचे मोबाइल नंबर ही कव्हर क्षेत्राच्या बाहेर असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा कंपनीबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.