शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

७ हजार १७३ शेतकरी झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:19 IST

परभणी: जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात ...

परभणी: जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात आणले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ७ हजार १७३ शेतकऱ्यांनी ३ कोटी रुपयांचा वीज बिल भरणा करून थकबाकीमुक्त झाले आहेत.

ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना दररोज पैसे द्यावे लागतात. मात्र महावितरणकडून वीज ग्राहकांना पुरवठा करण्यात आलेल्या वीज बिलाचा भरणा वेळेत होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या थकबाकीमुळे चालू देयके व थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली. मात्र या मोहिमेलाही कृषीपंपधारक व वीज ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीसमोर जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांची थकबाकी वसुली कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी राज्य शासन व महावितरण कंपनीच्या समन्वयातून महाकृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वीज ग्राहक व कृषीपंपधारकांनी आपल्याकडे असलेल्या थकबाकीचा भरणा केल्यास विलंब आकार व बिलातील व्याजातील सूट देण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत येणाऱ्या ७ हजार १७३ शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत ३ कोटी रुपयांचा थकबाकीचा भरणा केला आहे. त्यामुळे हे शेतकरी आता थकबाकीतून मुक्त झाले आहेत. मात्र या योजनेला घरगुती, वाणिज्य, लघुदाब, औद्योगिक, वीज ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील जवळपास ३०० हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

५९४ कोटी रुपयांची मिळणार माफी

राज्य शासन व महावितरण कंपनीच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे भरल्यास कृषीपंपधारकांना विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण ५७४ कोटी ७ लाख रुपयांची माफी मिळणार आहे. त्यामुळे महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत १,३८६ कोटी रुपयांपैकी ९६ हजार ८७० शेतकऱ्यांना केवळ ८११ कोटी ९३ लाख रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.

वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचा सत्कार

गंगाखेड उपविभागांतर्गत येणाऱ्या कृषीपंपधारकांनी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत आपल्या थकबाकीचा भरणा वीज वितरण कंपनीकडे केला आहे. हे शेतकरी महावितरणसाठी तारणहार ठरत असल्यामुळे गंगाखेड येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागात कार्यकारी अभियंत्याच्या उपस्थितीत थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.