शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

५९ हजार लाभार्थ्यांना निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

परभणी: कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्यातील ५८ हजार ६७४ शेतकरी लाभार्थ्यांनी १३ ...

परभणी: कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्यातील ५८ हजार ६७४ शेतकरी लाभार्थ्यांनी १३ योजनेतील घटकांचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले. या लाभार्थ्यांना आता राज्य शासनाकडून कृषी कार्यालयाला प्राप्त होणाऱ्या निधीची प्रतीक्षा लागली आहे.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी तसेच नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच पोर्टलद्वारे देण्याच्या हेतूने राज्य शासनाने माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या साहाय्याने महाडीबीटी पोर्टल विकसित केले. या पोर्टलअंतर्गत जिल्ह्यातील ५८ हजार ६७४ शेतकऱ्यांनी १० जानेवारीपर्यंत १३ योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टर, पॉवर ट्रील, मनुष्य व बैलचलित औजारे, सूक्ष्मसिंचन, शेततळे, फळबाग लागवड, काढणी पश्चात व्यवस्थापन, रोपवाटिका, कांदा चाळ, संरक्षित शेती, नवीन विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्त करणे, इवेल बोअरिंग, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील घटकांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक जिल्ह्यातील १७ हजार १२३ लाभार्थ्यांनी ट्रॅक्टरसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. आता या शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा कृषी विभागाला प्राप्त निधी झाल्यानंतर या लाभार्थ्यांना सोडत पद्धतीने १३ योजनेतील घटकांचा लाभ दिला जाणारआहे. त्यानुसार या ५९ हजार लाभार्थ्यांचे राज्य शासनाच्या निधीकडे लक्ष लागले आहे.

तालुकानिहाय दाखल झालेले प्रस्ताव

‘एक अर्ज योजना अनेक’मध्ये कृषी आयुक्तालयाच्या वतीने दिलेल्या १० जानेवारीपर्यंतच्या मुदतीमध्ये ५८ हजार ६७४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केलेले आहेत. यामध्ये परभणी तालुक्यातील ११ हजार ८३१, जिंतूर तालुक्यातील १० हजार १९२, सेलू तालुक्यातील ५ हजार ५२०, मानवत तालुक्यातील ५ हजार १५१, पाथरी तालुक्यातील ६ हजार ६७६, गंगाखेड तालुक्यातील ३ हजार ८०४, सोनपेठ तालुक्यातील २ हजार ८२१, पालम तालुक्यातील ४ हजार ५८१ तर पूर्णा तालुक्यातील ८ हजार ९८ लाभार्थ्यांनी कृषी विभागाच्या १३ योजनेतील विविध घटकांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. आता कृषी विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर या घटकांना लाभार्थी घटकांना लाभ मिळणार आहे.