शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 17:11 IST

संपाच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  दोन दिवसांचा संप पुकारला आहे

परभणी : पगार पत्रकाच्या घटकांवर २० टक्के वेतनवाढ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी शुक्रवारी संपावर गेल्याने जिल्ह्यात सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प पडला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  दोन दिवसांचा संप पुकारला असून, या संपात परभणी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे सुमारे तीन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. दररोज बँकांमधून होणारे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. त्यात आरटीजीएस, एनईएफटी, चेक क्लिअरन्स, खात्यामधून रक्कम काढणे, रक्कम जमा करणे ही सर्व कामे दिवसभर ठप्प पडली. त्यामुळे सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी इंडिया बँकेच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर महात्मा फुले यांचा पुतळा, जिल्हा स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.  जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकंदर बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प पडल्याचे दिसून आले.

वीस बॅंकांच्या कर्मचाऱ्यांचा सहभागपरभणी जिल्ह्यात २० राष्ट्रीयीकृत बँका असून या बँकांच्या १६४ शाखा जिल्हाभरात विखुरलेल्या आहेत. या सर्व शाखांमधील सुमारे ३ हजार कर्मचारी आजच्या संपामध्ये सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. काय आहेत मागण्या पगार पत्रकाच्या घटकांवर २० टक्के वेतनवाढ द्यावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, स्पेशल अलाऊन्स हा बेसिकमध्ये समाविष्ट करावा, एनपीएस योजना निकाली काढावी, पेन्शनमध्ये सुधारणा करा, अधिकार्‍यांसाठी कामाचे तास निश्चित करावेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावे, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

टॅग्स :bankबँकparabhaniपरभणीbusinessव्यवसाय