शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

परभणीच्या उरुसात २० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:28 IST

येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येणाºया भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटल्याचे स्पष्ट होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येणाºया भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटल्याचे स्पष्ट होत आहे़सय्यद शाह तुराबूल हक यांचा उरुस राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखला जातो़ १५० वर्षांची परंपरा असलेल्या या उरुसात दरवर्षी लाखो भाविक दाखल होतात़ उरुसातील भाविकांची संख्या लक्षात घेवून राज्यासह परराज्यातूनही व्यापारी या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने येत आहेत़ यावर्षी ३१ जानेवारी रोजी उरुसाला प्रारंभ झाला़ १६ फेब्रुवारीपर्यंत या उरुस काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती़ मीना बाजार, विविध आकाश पाळणे, मनोरंजनाचे खेळ यासह वेगवेगळ्या राज्यातून प्रसिद्ध असलेली मिठाई उरुसामध्ये विक्री झाली़या काळात झालेल्या उलाढालीचा एकंदर आढावा घेतला असता सुमारे २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे़ उरुसामध्ये साधारणत: ९५० व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती़ त्यात महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांपासून ते संसारोपयोगी वस्तू, मुलांची खेळणी, कपडे असे विविध स्टॉल्स उपलब्ध होते़ या बाजारात प्रत्येक दुकानामध्ये दररोज सुमारे ८ हजार रुपयांचा व्यवसाय झाला़ १५ दिवसांच्या काळात ११ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवसाय या ठिकाणी झाला आहे़ तर मीना बाजारातून जवळपास ९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे़ याशिवाय रस्त्याच्या कडेला विविध वस्तू विक्री करणारे लघु व्यावसायिक, खाद्य पदार्थाची दुकाने या माध्यमातूनही मोठी उलाढाल झाली आहे़ एकंदर, सर्व साधारणपणे २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे़वक्फ बोर्डाला २७ लाखांचे उत्पन्न४परभणी जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून येथील उरुसाचे नियोजन केले जाते़ उरुसात लावले जाणारे स्टॉल्स, फेरीवाले यांच्याकडून वक्फ बोर्डाला उत्पन्न प्राप्त होते़ त्यानुसार ९५० दुकानांच्या माध्यमातून ९७ लाख ९३ हजार ५०० रुपये, फेरीवाल्यांकडून २ लाख ९९ हजार रुपये, वेगवेगळ्या आकाश पाळणे व्यावसायिकांकडून ८ लाख ८५ हजार रुपये आणि विद्युत कंत्राटदाराच्या माध्यमातून २ लाख १० हजार रुपये असे सुमारे ४१ लाख ९३ हजार रुपयांचे उत्पन्न वक्फ बोर्डाला प्राप्त झाले आहे़ त्या तुलनेत बोर्डाच्या वतीने संदल, उरुसाची प्रसार, प्रसिद्धीसाठी ५५ हजार रुपये आणि इतर १५ लाख रुपये खर्च केले असून, प्राप्त उत्पन्नामधून बोर्डाला १५ लाख ५५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ त्यामुळे उरुसाच्या माध्यमातून वक्फ बोर्डाला २६ लाख ३८ हजार निव्वल उत्पन्न प्राप्त झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीurseउर्सेReligious programmeधार्मिक कार्यक्रम