शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

परभणीच्या उरुसात २० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:28 IST

येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येणाºया भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटल्याचे स्पष्ट होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येणाºया भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटल्याचे स्पष्ट होत आहे़सय्यद शाह तुराबूल हक यांचा उरुस राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखला जातो़ १५० वर्षांची परंपरा असलेल्या या उरुसात दरवर्षी लाखो भाविक दाखल होतात़ उरुसातील भाविकांची संख्या लक्षात घेवून राज्यासह परराज्यातूनही व्यापारी या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने येत आहेत़ यावर्षी ३१ जानेवारी रोजी उरुसाला प्रारंभ झाला़ १६ फेब्रुवारीपर्यंत या उरुस काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती़ मीना बाजार, विविध आकाश पाळणे, मनोरंजनाचे खेळ यासह वेगवेगळ्या राज्यातून प्रसिद्ध असलेली मिठाई उरुसामध्ये विक्री झाली़या काळात झालेल्या उलाढालीचा एकंदर आढावा घेतला असता सुमारे २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे़ उरुसामध्ये साधारणत: ९५० व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती़ त्यात महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांपासून ते संसारोपयोगी वस्तू, मुलांची खेळणी, कपडे असे विविध स्टॉल्स उपलब्ध होते़ या बाजारात प्रत्येक दुकानामध्ये दररोज सुमारे ८ हजार रुपयांचा व्यवसाय झाला़ १५ दिवसांच्या काळात ११ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवसाय या ठिकाणी झाला आहे़ तर मीना बाजारातून जवळपास ९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे़ याशिवाय रस्त्याच्या कडेला विविध वस्तू विक्री करणारे लघु व्यावसायिक, खाद्य पदार्थाची दुकाने या माध्यमातूनही मोठी उलाढाल झाली आहे़ एकंदर, सर्व साधारणपणे २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे़वक्फ बोर्डाला २७ लाखांचे उत्पन्न४परभणी जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून येथील उरुसाचे नियोजन केले जाते़ उरुसात लावले जाणारे स्टॉल्स, फेरीवाले यांच्याकडून वक्फ बोर्डाला उत्पन्न प्राप्त होते़ त्यानुसार ९५० दुकानांच्या माध्यमातून ९७ लाख ९३ हजार ५०० रुपये, फेरीवाल्यांकडून २ लाख ९९ हजार रुपये, वेगवेगळ्या आकाश पाळणे व्यावसायिकांकडून ८ लाख ८५ हजार रुपये आणि विद्युत कंत्राटदाराच्या माध्यमातून २ लाख १० हजार रुपये असे सुमारे ४१ लाख ९३ हजार रुपयांचे उत्पन्न वक्फ बोर्डाला प्राप्त झाले आहे़ त्या तुलनेत बोर्डाच्या वतीने संदल, उरुसाची प्रसार, प्रसिद्धीसाठी ५५ हजार रुपये आणि इतर १५ लाख रुपये खर्च केले असून, प्राप्त उत्पन्नामधून बोर्डाला १५ लाख ५५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ त्यामुळे उरुसाच्या माध्यमातून वक्फ बोर्डाला २६ लाख ३८ हजार निव्वल उत्पन्न प्राप्त झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीurseउर्सेReligious programmeधार्मिक कार्यक्रम