शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

परभणी जिल्ह्यात ४१ हजार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:57 IST

जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकापैकी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रावरील ८ तालुक्यांतील ४१ हजार २२७ शेतकºयांनी कृषी विभागाकडे ३ डिसेंबरपर्यंत मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकापैकी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रावरील ८ तालुक्यांतील ४१ हजार २२७ शेतकºयांनी कृषी विभागाकडे ३ डिसेंबरपर्यंत मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरीप पेरणीचे नियोजन केले होते़ त्यापैकी २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित होते़ प्रत्यक्षात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़ बहुतांश भागात कापसाची पहिली वेचणी झाली असून, सर्वसाधारणपणे चार वेचण्या होतात़ मात्र पहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यातील कापूस पिकाला शेंद्री बोंडअळीने घेरल्याचे दिसत आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्व भागांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत़ कृषी विभागाबरोबरच प्रशासनालाही या संकटाची चाहूल लागल्यानंतर उपाययोजनेची कामे सुरू करण्यात आली होती़ तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला बोंडअळीग्रस्त भागाचा सर्वे करून बाधीत क्षेत्राचे अर्ज शेतकºयांकडून घेण्यात यावेत, असे आदेश दिले होते़ त्यानुसार कृषी विभागाने शेतकºयांना नमुना जी, एच हे अर्ज तत्काळ सादर करावेत, असे आवाहन केले होते़ त्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती़ या अर्जासोबत सातबारा, होल्डींग, पीकपेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडून हा प्रस्ताव शेतकºयांना तालुका बीज निरीक्षकांकडे सादर करावयाचा होता़ त्यानुसार शेतकºयांनी आपल्या बाधीत क्षेत्राचे अर्ज कृषी विभागाकडे सादर करण्यास सुरुवात केली़ ३० नोव्हेंंबर रोजी कृषी विभागाच्या कार्यालयाला अक्षरश: यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते़अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांची वाढती संख्या पाहून कृषी विभागाने ३ डिसेंबरपर्यंत बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तक्रार अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली होती़ त्यानुसार शेतकºयांनी बाधित क्षेत्राचे अर्ज कृषी विभागाकडे सादर केले आहेत़ ३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील पालम तालुका वगळता ८ तालुक्यातून ४१ हजार २२७ शेतकºयांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत़आता कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये बोंडअळीग्रस्त बाधित क्षेत्राचे गावनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे कृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्षात माहिती समोर येणार आहे़