शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

परभणी जिल्ह्यात ४१ हजार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:57 IST

जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकापैकी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रावरील ८ तालुक्यांतील ४१ हजार २२७ शेतकºयांनी कृषी विभागाकडे ३ डिसेंबरपर्यंत मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकापैकी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रावरील ८ तालुक्यांतील ४१ हजार २२७ शेतकºयांनी कृषी विभागाकडे ३ डिसेंबरपर्यंत मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरीप पेरणीचे नियोजन केले होते़ त्यापैकी २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित होते़ प्रत्यक्षात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़ बहुतांश भागात कापसाची पहिली वेचणी झाली असून, सर्वसाधारणपणे चार वेचण्या होतात़ मात्र पहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यातील कापूस पिकाला शेंद्री बोंडअळीने घेरल्याचे दिसत आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्व भागांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत़ कृषी विभागाबरोबरच प्रशासनालाही या संकटाची चाहूल लागल्यानंतर उपाययोजनेची कामे सुरू करण्यात आली होती़ तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला बोंडअळीग्रस्त भागाचा सर्वे करून बाधीत क्षेत्राचे अर्ज शेतकºयांकडून घेण्यात यावेत, असे आदेश दिले होते़ त्यानुसार कृषी विभागाने शेतकºयांना नमुना जी, एच हे अर्ज तत्काळ सादर करावेत, असे आवाहन केले होते़ त्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती़ या अर्जासोबत सातबारा, होल्डींग, पीकपेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडून हा प्रस्ताव शेतकºयांना तालुका बीज निरीक्षकांकडे सादर करावयाचा होता़ त्यानुसार शेतकºयांनी आपल्या बाधीत क्षेत्राचे अर्ज कृषी विभागाकडे सादर करण्यास सुरुवात केली़ ३० नोव्हेंंबर रोजी कृषी विभागाच्या कार्यालयाला अक्षरश: यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते़अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांची वाढती संख्या पाहून कृषी विभागाने ३ डिसेंबरपर्यंत बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तक्रार अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली होती़ त्यानुसार शेतकºयांनी बाधित क्षेत्राचे अर्ज कृषी विभागाकडे सादर केले आहेत़ ३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील पालम तालुका वगळता ८ तालुक्यातून ४१ हजार २२७ शेतकºयांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत़आता कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये बोंडअळीग्रस्त बाधित क्षेत्राचे गावनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे कृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्षात माहिती समोर येणार आहे़