शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

जिंतूरात ३४ कोटींच्या कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

जिंतूर तालुक्यामध्ये कापूस हे नगदी पीक म्हणून समजल्या जाते. मागच्या दोन वर्षापासून कापसाच्या पेऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, ...

जिंतूर तालुक्यामध्ये कापूस हे नगदी पीक म्हणून समजल्या जाते. मागच्या दोन वर्षापासून कापसाच्या पेऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, खासगी बाजारपेठेमध्ये कापसाला म्हणावा तेवढा भाव मिळत नाही. सीसीआयमार्फत शासनाची कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा भाव मिळत आहे. जिंतूर येथे २३ नोव्हेंबरपासून सीसीआयमार्फत कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये सतनाम ट्रेडिंग कंपनीने १७ हजार ४३१ क्विंटल कापूस ९ कोटी ५८ लाख ७० हजार, विकास उद्योगाने १७ हजार ७२६ क्विंटल कापूस, ९ कोटी ७४ लाख ७३ हजार, रमन ॲग्रोने १० हजार ६६३ क्विंटल कापूस, ५ कोटी ८६ लाख ४२ हजार, वर्धमान जिनिंग ७ हजार ५९५ कापूस, ४ कोटी १७ लाख ७२ हजार, राधिका जिनिंग ४ हजार ८७४ क्विंटल कापूस २ कोटी ६८ लाख ७ हजार रुपये किमतीचा खरेदी केला आहे . सीसीआयने २४ दिवसात ५८ हजार २९१ क्विंटल कापूस ३२ कोटी ६ लाख ५०० रुपयांचा खरेदी केला असून खासगी बाजारपेठेत वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी ६ हजार ४६४ क्विंटल २ कोटी ९० लाख रुपयांचा कापूस खरेदी केला आहे. सीसीआयकडून कापसाला ५५०० ते ५७०० पर्यंत भाव देत आहे. तर खासगी बाजारपेठेत हेच भाव ४५०० रुपयांपर्यंत आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्याकडील स्वच्छ प्रतीचा कापूस जिंतूर सीसीआयकडे विक्रीसाठी आणावा. दररोज २०० ते २५० वाहनाचे मोजमाप होत आहेत. शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती बारकाईने लक्ष ठेवून आहे.

मनोज थिटे, मुख्य प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिंतूर.