शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

'स्वच्छ परभणी'चा ३०० स्वच्छता दुतांनी घेतला ध्यास; दर रविवारी राबविली जातेय निरंतर मोहीम

By राजन मगरुळकर | Updated: March 10, 2024 17:39 IST

सहा महिन्यांपूर्वी १० सदस्य, आता स्वच्छतादुतांची संख्या ३००पार

राजन मंगरुळकर, परभणी: आपले शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त, रोगराईमुक्त व सुसज्ज असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध भागांत सामान्य नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यास सुरुवात झाली. सहा महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला १० सदस्य असलेल्या मोहिमेत आता प्रचार, प्रसार आणि कार्यामुळे सदस्य संख्या ३०० दुतापर्यंत पोहोचली आहे. दर रविवारी किमान दोन तास नवीन वसाहतीमध्ये श्रमदान स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ परभणीचा ध्यास सहभागी दूतांनी घेतला आहे.

जगात जर्मनी आणि भारतात आपली परभणी असे नेहमीच बोलले जाते. याच परभणीचे आगळे वेगळेपण अनेक बाबींमध्ये आहे. हे वेगळेपण ठळकपणे जाणवते. शहराची वाढलेली व्याप्ती, वसाहतींचा विस्तार, लोकसंख्या आणि वाढलेल्या समस्या सोडविण्यासाठी केवळ प्रशासनावरच अवलंबून न राहता सामान्य नागरिकांच्या सहभागातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी संकल्प करण्यात आला. शहरातील विविध भागातील घाणीचे साम्राज्य, पसरणारे आजार, रोगराई, अस्वच्छता कमी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गांधी जयंतीदिनी दोन ऑक्टोबर २०२३ ला हृदयरोग तज्ञ डॉ.राहुल आंबेगावकर यांच्या संकल्पनेतून ग्रुपची स्थापना झाली. प्रत्येक आठवड्यात रविवारी नियोजित ठिकाणी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत मोहीम राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. सुरुवातीला यामध्ये दहा स्वच्छता दूतांनी सहभाग नोंदविला. मोहिमेची सुरुवात झाली, त्या नंतर शहरात दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढली. सोबतच हे काम पाहून हळूहळू सदस्य संख्या वाढली आणि विविध भागांमध्ये नवीन सदस्यांनी आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी सहभाग नोंदविला.

विविध प्रभागातील नागरिक, डॉक्टर, वैद्यकीय प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक, बँक कर्मचारी, अभियंते, व्यापारी, व्यावसायिक, तरुण अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वच्छता दूत म्हणून सहभागी होण्याचा निश्चय केला. या सर्वांनी केवळ आपल्या प्रभागातच स्वच्छता न करता नवीन प्रभाग शोधून त्या-त्या ठिकाणी दर रविवारी जाऊन दोन तास श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे नवे स्वच्छता दूत जोडल्या गेले आणि ही मोहीम गेल्या ३२ आठवड्यांपासून दर रविवारी सुरु आहे. यामध्ये डॉ.संदीप कार्ले, डॉ.विजय साई शेळके, डॉ.शेखर देशमुख, डॉ. दिनेश भुतडा, डॉ.गजानन जोशी, डॉ.केदार कटिंग यांनीही सहभाग नोंदविला.

या भागात स्वच्छतेचे प्रयत्न

मोहिमेंतर्गत आजपर्यंत प्रभावती नगर, गांधी पार्क, व्यंकटेश नगर, नवीन जिल्हा परिषद इमारत, बस स्थानक, डॉक्टर लेन, पूर्व प्रभावती नगर, त्रिमूर्ती नगर, मंगलमूर्ती नगर, ममता कॉलनी पाण्याची टाकी, गजानन नगर, जैन मंदिर याशिवाय अन्य भागातही सक्रियपणे राबविण्यात आली. मंदिर, मोकळी जागा, शिवाय वसाहतीतील अन्य समस्या ज्या स्वच्छता दूतांना सोडविता येतील, अशा सर्व बाबी मांडल्या. माझा परिसर स्वच्छ ठेवणे माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वजण पुढे सरसावले आहेत. त्यातून आपली परभणी, स्वच्छ परभणी करण्याचा निरंतर संकल्प सुरु आहे.

या बाबींची जनजागृती

कचरा जाळायचा नाही, तो घंटागाडीत टाकायचा, झाडे तोडायचे नाहीत, खूप मोठा भाग स्वच्छ करण्यापेक्षा छोटा भाग निवडून त्या ठिकाणी पूर्ण काम करायचे, वेगवेगळ्या कॉलनीत डर्टी पॉइंट नष्ट करण्यासाठी, स्वच्छतेबद्दल जनजागृती करावी, ⁠प्रत्येक ठिकाणी रिकामे प्लॉट्स हे कचराकुंडी झालेत. त्यामुळे ते साफ करणे याची जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान