शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

'स्वच्छ परभणी'चा ३०० स्वच्छता दुतांनी घेतला ध्यास; दर रविवारी राबविली जातेय निरंतर मोहीम

By राजन मगरुळकर | Updated: March 10, 2024 17:39 IST

सहा महिन्यांपूर्वी १० सदस्य, आता स्वच्छतादुतांची संख्या ३००पार

राजन मंगरुळकर, परभणी: आपले शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त, रोगराईमुक्त व सुसज्ज असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध भागांत सामान्य नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यास सुरुवात झाली. सहा महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला १० सदस्य असलेल्या मोहिमेत आता प्रचार, प्रसार आणि कार्यामुळे सदस्य संख्या ३०० दुतापर्यंत पोहोचली आहे. दर रविवारी किमान दोन तास नवीन वसाहतीमध्ये श्रमदान स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ परभणीचा ध्यास सहभागी दूतांनी घेतला आहे.

जगात जर्मनी आणि भारतात आपली परभणी असे नेहमीच बोलले जाते. याच परभणीचे आगळे वेगळेपण अनेक बाबींमध्ये आहे. हे वेगळेपण ठळकपणे जाणवते. शहराची वाढलेली व्याप्ती, वसाहतींचा विस्तार, लोकसंख्या आणि वाढलेल्या समस्या सोडविण्यासाठी केवळ प्रशासनावरच अवलंबून न राहता सामान्य नागरिकांच्या सहभागातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी संकल्प करण्यात आला. शहरातील विविध भागातील घाणीचे साम्राज्य, पसरणारे आजार, रोगराई, अस्वच्छता कमी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गांधी जयंतीदिनी दोन ऑक्टोबर २०२३ ला हृदयरोग तज्ञ डॉ.राहुल आंबेगावकर यांच्या संकल्पनेतून ग्रुपची स्थापना झाली. प्रत्येक आठवड्यात रविवारी नियोजित ठिकाणी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत मोहीम राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. सुरुवातीला यामध्ये दहा स्वच्छता दूतांनी सहभाग नोंदविला. मोहिमेची सुरुवात झाली, त्या नंतर शहरात दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढली. सोबतच हे काम पाहून हळूहळू सदस्य संख्या वाढली आणि विविध भागांमध्ये नवीन सदस्यांनी आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी सहभाग नोंदविला.

विविध प्रभागातील नागरिक, डॉक्टर, वैद्यकीय प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक, बँक कर्मचारी, अभियंते, व्यापारी, व्यावसायिक, तरुण अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वच्छता दूत म्हणून सहभागी होण्याचा निश्चय केला. या सर्वांनी केवळ आपल्या प्रभागातच स्वच्छता न करता नवीन प्रभाग शोधून त्या-त्या ठिकाणी दर रविवारी जाऊन दोन तास श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे नवे स्वच्छता दूत जोडल्या गेले आणि ही मोहीम गेल्या ३२ आठवड्यांपासून दर रविवारी सुरु आहे. यामध्ये डॉ.संदीप कार्ले, डॉ.विजय साई शेळके, डॉ.शेखर देशमुख, डॉ. दिनेश भुतडा, डॉ.गजानन जोशी, डॉ.केदार कटिंग यांनीही सहभाग नोंदविला.

या भागात स्वच्छतेचे प्रयत्न

मोहिमेंतर्गत आजपर्यंत प्रभावती नगर, गांधी पार्क, व्यंकटेश नगर, नवीन जिल्हा परिषद इमारत, बस स्थानक, डॉक्टर लेन, पूर्व प्रभावती नगर, त्रिमूर्ती नगर, मंगलमूर्ती नगर, ममता कॉलनी पाण्याची टाकी, गजानन नगर, जैन मंदिर याशिवाय अन्य भागातही सक्रियपणे राबविण्यात आली. मंदिर, मोकळी जागा, शिवाय वसाहतीतील अन्य समस्या ज्या स्वच्छता दूतांना सोडविता येतील, अशा सर्व बाबी मांडल्या. माझा परिसर स्वच्छ ठेवणे माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वजण पुढे सरसावले आहेत. त्यातून आपली परभणी, स्वच्छ परभणी करण्याचा निरंतर संकल्प सुरु आहे.

या बाबींची जनजागृती

कचरा जाळायचा नाही, तो घंटागाडीत टाकायचा, झाडे तोडायचे नाहीत, खूप मोठा भाग स्वच्छ करण्यापेक्षा छोटा भाग निवडून त्या ठिकाणी पूर्ण काम करायचे, वेगवेगळ्या कॉलनीत डर्टी पॉइंट नष्ट करण्यासाठी, स्वच्छतेबद्दल जनजागृती करावी, ⁠प्रत्येक ठिकाणी रिकामे प्लॉट्स हे कचराकुंडी झालेत. त्यामुळे ते साफ करणे याची जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान