शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

संचारबंदीच्या काळात २६ हजार पॉझिटिव्ह; कडक अंमलबजावणी नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ ...

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेनंतर राज्य शासनानेच संचारबंदी लागू केल्याने रुग्णासंख्येत घट होईल, असा सर्वसामान्यांचा समज होता. प्रत्यक्षात यासंदर्भातील आकडेवारीचा आढावा घेतला असता रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २२ मार्च २०२० ते २४ मार्च २०२१ या १ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात फक्त १२ हजार २५८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १० हजार ६२३ जणांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर २५ मार्च ते ४ मे या कालावधीत जिल्ह्यात तब्बल २६ हजार १८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १९ हजार ५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आली होती. आता ४० दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी कडकडीत अंमलबजावणीला खो देण्यात आला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे पहिल्या टप्प्यात प्रभावी काम झाले होते. दुसऱ्या टप्प्यात याबाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.

दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा विषाणू जास्त घातक आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे. परिणामी, संपूर्ण कुटुंबच कोरोनाबधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रामीण भागांत रुग्ण वाढले, कारण?

पहिल्या टप्प्यात कोरोनाचा ग्रामीण भागात अधिक फैलाव झाला नव्हता. जिल्ह्यातील ८४८ गावांपैकी ३८४ गावांमध्ये कोरोना पोहोचला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी ग्रामपातळीवत प्रभावीपणे झाली नाही. परिणामी, पहिल्या टप्प्यात कोरोनापासून दूर राहिलेल्या २०९ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचे संख्य झपाट्याने वाढली.