शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संचारबंदीच्या काळात २६ हजार पॉझिटिव्ह; कडक अंमलबजावणी नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ ...

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेनंतर राज्य शासनानेच संचारबंदी लागू केल्याने रुग्णासंख्येत घट होईल, असा सर्वसामान्यांचा समज होता. प्रत्यक्षात यासंदर्भातील आकडेवारीचा आढावा घेतला असता रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २२ मार्च २०२० ते २४ मार्च २०२१ या १ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात फक्त १२ हजार २५८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १० हजार ६२३ जणांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर २५ मार्च ते ४ मे या कालावधीत जिल्ह्यात तब्बल २६ हजार १८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १९ हजार ५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आली होती. आता ४० दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी कडकडीत अंमलबजावणीला खो देण्यात आला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे पहिल्या टप्प्यात प्रभावी काम झाले होते. दुसऱ्या टप्प्यात याबाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.

दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा विषाणू जास्त घातक आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे. परिणामी, संपूर्ण कुटुंबच कोरोनाबधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रामीण भागांत रुग्ण वाढले, कारण?

पहिल्या टप्प्यात कोरोनाचा ग्रामीण भागात अधिक फैलाव झाला नव्हता. जिल्ह्यातील ८४८ गावांपैकी ३८४ गावांमध्ये कोरोना पोहोचला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी ग्रामपातळीवत प्रभावीपणे झाली नाही. परिणामी, पहिल्या टप्प्यात कोरोनापासून दूर राहिलेल्या २०९ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचे संख्य झपाट्याने वाढली.