शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

संचारबंदीच्या काळात २६ हजार पॉझिटिव्ह; कडक अंमलबजावणी नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ ...

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेनंतर राज्य शासनानेच संचारबंदी लागू केल्याने रुग्णासंख्येत घट होईल, असा सर्वसामान्यांचा समज होता. प्रत्यक्षात यासंदर्भातील आकडेवारीचा आढावा घेतला असता रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २२ मार्च २०२० ते २४ मार्च २०२१ या १ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात फक्त १२ हजार २५८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १० हजार ६२३ जणांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर २५ मार्च ते ४ मे या कालावधीत जिल्ह्यात तब्बल २६ हजार १८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १९ हजार ५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आली होती. आता ४० दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी कडकडीत अंमलबजावणीला खो देण्यात आला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे पहिल्या टप्प्यात प्रभावी काम झाले होते. दुसऱ्या टप्प्यात याबाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.

दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा विषाणू जास्त घातक आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे. परिणामी, संपूर्ण कुटुंबच कोरोनाबधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रामीण भागांत रुग्ण वाढले, कारण?

पहिल्या टप्प्यात कोरोनाचा ग्रामीण भागात अधिक फैलाव झाला नव्हता. जिल्ह्यातील ८४८ गावांपैकी ३८४ गावांमध्ये कोरोना पोहोचला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी ग्रामपातळीवत प्रभावीपणे झाली नाही. परिणामी, पहिल्या टप्प्यात कोरोनापासून दूर राहिलेल्या २०९ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचे संख्य झपाट्याने वाढली.