शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

परभणी जिल्ह्यात तीन गावांसाठी २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:49 IST

अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना २५ लाखांच्या निधी खर्चास राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना २५ लाखांच्या निधी खर्चास राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे़ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक बहुल भागाचा विकास व्हावा, तेथे मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी शासनाच्या वतीने निधी देण्यात येतो. या अंतर्गत खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात येतो़ परभणी तालुक्यातून पेगरगव्हाण, तरोडा येथे अल्पसंख्यांक वस्तीतील सिमेंट रस्ता कामासाठी निधीस मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता़ तसेच गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील नवी अबादी कॉलनीमध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा़, असा प्रस्ताव शासनाकडे दाखल झाला होता़ या प्रस्तावांना शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली असून, पेगरगव्हाण व तरोडा येथील कामासाठी प्रत्येकी १० लाख रुपये तर राणीसावरगाव येथील कामासाठी ५ लाख रुपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली आहे़ यामुळे विकास कामे मार्गी लागणार आहेत़बदल करण्याचे : अधिकार जिल्हाधिकाºयांनामंजूर करण्यात आलेल्या ठिकाणी इतर योजनेतून कामे करण्यात आलेली नाहीत, याची शहानिशा व खातरजमा जिल्हाधिकारी यांना करावी लागणार आहे़ तसेच या ठिकाणी इतर योजनेतून कामे मंजूर झाल्यास त्या बदल्यात इतर काम मंजूर निधीच्या मर्यादेत राहून बदल करण्याचे अधिकारही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत़ कामाच्या बदल्यात इतर काम करणे शक्य नसल्यास वितरित केलेला निधी शासनाला जमा करावा लागणार आहे़ तसेच या कामाचे अंदाजपत्रक सा़बां़ विभागाकडून घेऊन अटी व शर्तीनुसार कारवाईनंतर जिल्हा परिषदेकडे निधी सुपूर्द करण्यात येणार आहे़ मंजूर झालेला निधी त्याच कामासाठी ग्रामपंचायतींना वापरावा लागणार आहे़