शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मुदत संपूनही २३ हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST

परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असला तरी २३ हजार ५१७ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लसीकरण ...

परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असला तरी २३ हजार ५१७ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लसीकरण करून घेतले नाही. कधी लसीचा तुटवडा तर कधी नागरिकांचा निष्काळजीपणा होत असल्याने हा आकडा वाढला आहे.

मागील महिनाभरापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे. मात्र आतापर्यंत दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लस न घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या मुबलक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाला आहे.

दुसरा डोस घेणेही तितकाच आवश्यक

n कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. तरच लस परिणामकारक ठरणार आहे.

n शरीरात पूर्णत: ॲण्टीबॉडीज् वाढण्यासाठी दोन्ही डोस घ्यावे लागतील. तरच कोरोनापासून नागरिक सुरक्षित होऊ शकतात.

नेमकी अडचण काय?

जिल्ह्यात मागील महिन्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे तारीख आल्यानंतरही अनेकांना लस घेता आली नाही. काही जण जास्तीत जास्त उशिरा लस घेतली तर चांगला परिणाम होतो, अशा समजुतीतून उशिरा लस घेत आहेत. तर कोरोना कमी झाल्याने नागरिकांची भीती कमीही कमी झाली आहे. त्याचाही परिणाम लसीकरणावर होत आहे.

चार दिवसांपूर्वीच जिल्ह्याला ९० हजार लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लसीची कमतरता भासणार नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी दोन्ही डोसचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

- डॉ.रावजी सोनवणे, लसीकरण प्रमुख