शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही २३ हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST

परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असला तरी २३ हजार ५१७ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लसीकरण ...

परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असला तरी २३ हजार ५१७ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लसीकरण करून घेतले नाही. कधी लसीचा तुटवडा तर कधी नागरिकांचा निष्काळजीपणा होत असल्याने हा आकडा वाढला आहे.

मागील महिनाभरापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे. मात्र आतापर्यंत दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लस न घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या मुबलक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाला आहे.

दुसरा डोस घेणेही तितकाच आवश्यक

n कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. तरच लस परिणामकारक ठरणार आहे.

n शरीरात पूर्णत: ॲण्टीबॉडीज् वाढण्यासाठी दोन्ही डोस घ्यावे लागतील. तरच कोरोनापासून नागरिक सुरक्षित होऊ शकतात.

नेमकी अडचण काय?

जिल्ह्यात मागील महिन्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे तारीख आल्यानंतरही अनेकांना लस घेता आली नाही. काही जण जास्तीत जास्त उशिरा लस घेतली तर चांगला परिणाम होतो, अशा समजुतीतून उशिरा लस घेत आहेत. तर कोरोना कमी झाल्याने नागरिकांची भीती कमीही कमी झाली आहे. त्याचाही परिणाम लसीकरणावर होत आहे.

चार दिवसांपूर्वीच जिल्ह्याला ९० हजार लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लसीची कमतरता भासणार नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी दोन्ही डोसचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

- डॉ.रावजी सोनवणे, लसीकरण प्रमुख