शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

परभणी जिल्ह्याचा २३० कोटींचा निधी अडकला आचारसंहितेच्या कचाट्यात

By मारोती जुंबडे | Updated: March 22, 2024 18:58 IST

याद्यांवरील आक्षेप फेटाळले : खर्चाबाबत शासनाकडून मार्गदर्शन

परभणी : जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता राखणाऱ्या जिल्हा नियोजन समितीतील जवळपास २३० कोटी रुपयांच्या निधीतील याद्यांवर आक्षेप घेत कोर्टात दाखल केले होते. मात्र, कोर्टाने या याचिका फेटाळल्या. परंतु, आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने हा निधी खर्च करता येणार नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ४ जूनपर्यंत वेट ॲंड वॉचची भूमिका घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आपेक्षित विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन वार्षिक योजनेंतर्गत २०२३-२४ साठी २७३ कोटी ५०लाख रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील सेवा-सुविधांसाठी राज्य शासनाने विशेष निधी मंजूर केला. यामध्ये १६ कोटी ५० लाख अधिकचे आले. त्यामुळे ही योजना २९० कोटींवर पोहचली. मात्र दुसरीकडे तत्कालीन पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ९ जुलै २०२३व १ सप्टेंबर २०२३ या दोन्ही याद्यांमध्ये जवळपास २३७ कोटी ७८ लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्या. परंतु, या याद्यांवर आक्षेप घेत जिल्ह्यातील काही जण कोर्टात गेले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कोर्टाने याद्यांवरील आक्षेप फेटाळले. त्यामुळे जवळपास २३० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला. परंतु, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने या निधीबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ४ जूनपर्यंत प्रशासनाकडून वेट ॲंड वॉचची भूमिका राहणार आहे.

या निधीचे काय होणार?

जिल्हा नियोजन समितीचा निधी हा ३१ मार्च पर्यंत खर्च करणे अपेक्षित असतो. मात्र दोन याद्यांवर आक्षेप घेतल्याने हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने दोन दिवसापूर्वी याद्यांवरील आक्षेप फेटाळले. परंतु, आता २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपण्यास केवळ आठ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. तर दुसरीकडे विकास निधी खर्च करण्यासंदर्भातील प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पार पाडणे शक्य नाही. त्यामुळे हा निधी अखर्चित राहणार ही शासनास परत जाणार हे मात्र कळायला मार्ग नाही.

जिल्ह्याचेच नुकसान

जिल्हा नियोजन समितीतील निधी जिल्ह्यातील विकास कामासाठी खर्च केल्या जातो. परंतु, यात आम्हाला डावलले असा आरोप करत काहीजण कोर्टात गेले. परिणामी, हा निधी २२ मार्चपर्यंत अखर्चित राहिला. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे ४ जून पर्यंत हा निधी जैसे थेच राहणार आहे. काही झाले तरी यामध्ये जिल्ह्यातील विकास कामे रखडलेली, पर्यायाने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी