शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

संचारबंदीच्या २३ दिवसात १५ हजार रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात समन्वय नसल्याने कोरोना संसर्ग वाढत असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात समन्वय नसल्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मागील २३ दिवसांमध्ये तब्बल १५ हजार ११६ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवेत असलेल्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची मुभा दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. कारण नसतानाही रस्त्यांवरून फिरणार्‍या नागरिकांना कोणीही अडवत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन संचारबंदीचे आदेश काढून मोकळे झाले; परंतु त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र गप्प आहे. ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली, तो उद्देश अजूनही साध्य झालेला नाही. उलट संचारबंदी काळातच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे.

संचारबंदी कळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. मात्र, घराबाहेर का फिरत आहात, याची साधी विचारणाही होत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरत आहेत. भाजी विक्रीची दुकाने बंद असतानाही मुख्य रस्ते वगळता इतर रस्त्यांवर सर्रास भाजीविक्री होत आहे. त्यामुळे जी गर्दी व्हायची ती होतच आहे. केवळ आदेश काढून प्रशासन मोकळे झाले आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने विपरित परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

३० मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १४ हजार ८५७ एवढी होती; परंतु १ ते २३ एप्रिल या २३ दिवसांमध्ये १५ हजार ११६ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २९ हजार ९७१वर पोहोचली. संसर्ग कमी व्हावा, या उद्देशाने संचारबंदी लागू करण्यात आली; परंतु त्याउलट संचारबंदी काळातच रुग्णसंख्या वाढली आहे.

२३ दिवसांत ३३१ मृत्यू

संचारबंदी काळातील २३ दिवसांमध्ये ३३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा संसर्ग किती गंभीर रूप धारण करत आहे, हे लक्षात येते; परंतु नागरिक त्याला गांभीर्याने घेत नाहीत. ३० मार्चपर्यंत जिल्ह्यात ४२३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. २३ एप्रिलपर्यंत ही संख्या ७५४वर पोहोचली आहे.