शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यात २० रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यात रविवारी कोरोनाने २० रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असल्याने जिल्हावासियांची धास्ती वाढली आहे. ...

परभणी : जिल्ह्यात रविवारी कोरोनाने २० रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असल्याने जिल्हावासियांची धास्ती वाढली आहे.

कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील दोन आठवड्यांपासून दररोज ६०० ते ७०० नागरिक कोरोनाबाधीत आढळत असल्याने जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मागच्या एक आठवड्यापासून कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. दररोज कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ही संख्याही वाढत असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. ११ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयातील १४ आणि खासगी रुग्णालयातील ६ अशा २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये १६ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांची धास्ती चांगलीच वाढली आहे.

कोरोनाबाधीत रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी ही संख्या कमी असली तरी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांची संख्याही कमीच आहे. रविवारी १ हजार ४२३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ८८१ अहवालांमध्ये २१२ आणि रॅपिड टेस्टच्या ४४२ अहवालांमध्ये १९३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आता एकूण रुग्ण संख्या २० हजार ५९० झाली असून, त्यापैकी १५ हजार ६६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५२९ रुग्णांचा आत्तापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ४ हजार 401 रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात ६८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १६१, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २१३, अक्षदा मंगल कार्यालयात १३५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ३ हजार ३०९ रुग्णांवर गृह विलगीकरणामध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.