शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत १५०२ जागांसाठी १७८५ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:00 IST

दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी १५०२ जागांसाठी जिल्हाभरातून तब्बल ३ हजार ७८ अर्ज दाखल करण्यात आले होते़ यापैकी १७८५ अर्ज प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़ १३ मार्च रोजी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात दुपारी १२ वाजता आॅनलाईन स्वयंचलित सोडत होणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी १५०२ जागांसाठी जिल्हाभरातून तब्बल ३ हजार ७८ अर्ज दाखल करण्यात आले होते़ यापैकी १७८५ अर्ज प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़ १३ मार्च रोजी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात दुपारी १२ वाजता आॅनलाईन स्वयंचलित सोडत होणार आहे़राज्य शासनाच्या वतीने दुर्बल व वंचित घटकातील बालकांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्या अंतर्गत १० फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली होती़ ११ मार्च रोजी अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत होती़ जिल्ह्यातील १५२ शाळांनी २५ टक्के प्रवेशासाठी नोंदणी केली होती़ जिल्ह्यात १५२ शाळांमध्ये १ हजार ५०२ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या़ यातील पहिलीसाठी १ हजार ४६३ तर पूर्व प्राथमिकच्या ३९ जागांचा समावेश आहे़ ११ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत गंगाखेड तालुक्यातील २६१ अर्ज दाखल झाले होते़ त्यापैकी ६१ अर्ज अपात्र ठरले आहेत़ तर २०० अर्ज पात्र ठरले आहेत़ जिंतूर तालुक्यातील १४६ अर्जांपैकी १०३ अर्ज पात्र ठरले असून, ४३ अर्ज अपात्र ठरले आहेत़ मानवत तालुक्यातून २८ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ७ अर्ज अपात्र ठरले आहेत़ पालम तालुक्यामध्ये ९१ अर्जापैकी ५ अर्ज अपात्र ठरले आहेत़ परभणी शहरातून ४८९ अर्जांपैकी १२६ अर्ज अपात्र ठरले आहेत़ परभणी ग्रामीणमधून ७६८ अर्जांपैकी २०५ अर्ज अपात्र ठरले आहेत़ पाथरी तालुक्यातून ४४ अर्जांपैकी १२ अर्ज तर पूर्णा तालुक्यातून ८१ अर्जांपैकी २८ अर्ज अपात्र ठरले आहेत़ सेलू तालुक्यातील २४१ अर्जांपैकी ६५ अर्ज अपात्र ठरले आहेत तर सोनपेठ तालुक्यातील २०७ अर्जांपैकी १९ अर्ज अपात्र ठरले असून, १८८ अर्ज पात्र ठरले आहेत़जनजागृतीमुळे वाढले अर्जयावर्षी सुरुवातीला जनजागृती नसल्याने २५ टक्के प्रवेशासाठी म्हणावे तेवढे अर्ज दाखल झाले नव्हते़ परंतु, महापालिका व शिक्षण विभागाच्या वतीने जनजागृती संदर्भात मुख्याध्यापक, शिक्षकांना नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ तसेच बॅनरही लावण्यात आले होते़ त्यामुळे यावर्षी जागेच्या तुलनेत अर्जांची संख्या वाढली असल्याचे दिसत आहे़